AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

कोरोना संपला असा समज सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात रोज एका तरी कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले. त्यानंतर पुन्हा 10 मृत्यू झाले आहेत.

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!
Corona
| Updated on: Mar 02, 2022 | 11:29 AM
Share

नाशिकः एकीकडे कोरोनाची (Corona) लाट संपली आहे, असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक निर्बंध हटले आहेत. दिल्लीने (Delhi) तर निर्बंधमुक्तीकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, नाशिकमध्ये (Nashik) कोरोनाचे मृत्यू काही केल्या थांबताना दिसत नाहीत. गेल्या दहा दिवसांत चक्क 10 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आज बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 555 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 8 हजार 896 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली आहे.

कोठे आहेत रुग्ण?

जिल्ह्यात अनेक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 18, बागलाण 9, चांदवड 12, देवळा 3, दिंडोरी 21, इगतपुरी 4, कळवण 6, मालेगाव 2, निफाड 15, पेठ 2, सिन्नर 9, सुरगाणा 15, त्र्यंबकेश्वर 45, येवला 8 असे एकूण 169 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 112, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 5 तर जिल्ह्याबाहेरील 21 रुग्ण असून, असे एकूण 307 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 758 रुग्ण आढळून आले आहेत.

कसे होतायत मृत्यू?

कोरोना संपला असा समज सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात रोज एका तरी कोरोना रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान कोरोनामुळे तब्बल 33 बळी गेल्याचे समोर आले आहे. यातले 18 बळी हे नाशिक महापालिका क्षेत्रात गेलेत, तर 16 बळी हे नाशिकच्या ग्रामीण भागात गेल्याचे समोर आले आहे. त्यात अजूनही कोरोनाचे मृत्यू सत्र सुरू आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडताना प्रत्येकाना मास्कचा वापर जरूर करावा. लस टोचून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

असे आहेत कोरोना मृत्यू

– 1 मार्च 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 28 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 27 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 26 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 25 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 24 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 23 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 22 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 21 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

– 20 फेब्रुवारी 2022 रोजीचे मृत्यू – 01

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...