मोठी बातमी! शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 3 वाजता…

| Updated on: Jan 16, 2023 | 2:14 PM

त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांचा आग्रह होता म्हणून प्रवेश दिला. पण तिकीटाची कमिटमेंट दिली नव्हती. त्या काही ज्येष्ठ नेत्या आहेत असं नाही. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता.

मोठी बातमी! शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 3 वाजता...
girish mahajan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या कालपासून नॉट रिचेबल आहेत. शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पुरस्कृत केलं आहे. त्यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. काल मुंबईत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्या नाशिकला गेल्या. तेव्हापासूनच त्या नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा दीड तास बाकी असतानाच पाटील या नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या सर्व प्रकरणावर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. यात खळबळजनक काय मला माहीत नाही. माघारीला अवघे दोन तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार कुठे जातो? कुठे राहतो? हा त्यांचा प्रश्न आहे. नॉट रिचेबल आहे आणि खळबळजनक बातमी आहे. पण यात खळबळजनक काहीच नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अर्ज कुणी मागे घ्यावा, कुणी ठेवावा याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी उभं राहावं, बसावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो 3 वाजेपर्यंत जाहीर होईल, असं महाजन यांनी सांगितलं.

अवघ्या 15 दिवसांपूर्वीच शुभांगी पाटील पक्षात आल्या. त्यांना तिकीटाची गॅरंटी दिली नव्हती. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करेल असं त्यांनी सांगितलं होतं. त्या वर्षभरापासून प्रवेश मागत होत्या. मलाही भेटल्या होत्या. जामनेरला आल्या होत्या. त्यामुळे त्यांना प्रवेश दिला.

त्या पक्षाच्या कार्यकर्त्या कधीच नव्हत्या. त्यांचा आग्रह होता म्हणून प्रवेश दिला. पण तिकीटाची कमिटमेंट दिली नव्हती. त्या काही ज्येष्ठ नेत्या आहेत असं नाही. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. त्यांनी कुठे जावं हा त्यांचा प्रश्न आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राजा के बेटा राजा नही होगा, असं शुभांगी पाटील म्हणाल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी काय म्हणावं, काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्या काही फार मोठ्या नेत्या नाहीत. त्या राजकारणात पहिल्यांदा आल्या आहेत. त्या काय म्हणतात हा त्यांचा प्रश्न आहे.

त्यांना किती महत्त्व द्यावं हा प्रश्न आहे. कारण त्या पूर्वी राजकारणातच नव्हत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्याला आम्ही पाठिंबा देऊ ती सीट निवडून आणायची आहे. आणि आमचा उमेदवार विजयी होईल हे मात्र निश्चित आहे, असंही त्यांनी सांगितलं.