Video : इगतपुरीत रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 12, 2022 | 9:55 AM

इगतपुरी तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Video : इगतपुरीत रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Follow us on

इगतपुरी, नाशिक : सध्या राज्यभर पावसाचा जोर चांगलाच (Maharashtra Rain Update) वाढतोय. अश्यात नाशकातही पावसाने (Nashik Rain) जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इगतपुरी तालुक्यातही पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. इगतपुरी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. इगतपुरी, घोटी शहरासह ग्रामीण भाग आणि एकूणच संपूर्ण तालुक्याचे जनजीवन यामुळे प्रभावित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आज शक्यतो घराबाहेर पडू नये, पालक वर्गानेही विद्यार्थी घरातच सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शाळांना सुट्टी जाहीर

इगतपुरी तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. इगतपुरी, घोटी शहरासह ग्रामीण भाग आणि एकूणच संपूर्ण तालुक्याचे जनजीवन यामुळे प्रभावित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आज (दि. 12) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान गेले तीन दिवस सुरू असलेला संततधार पाऊस आज तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने जनजीवन चांगलेच प्रभावित झाले असून ‘लेट पण थेट’ आलेल्या या पावसाने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडतांना दिसत आहे. इगतपुरी शहराच्या विविध भागात घरांमध्ये पाणी शिरले असून पाऊस अजूनही सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दारणाचे 52 दरवाजे उघडले

इगतपुरीतील दारणा धरणाच्या 52 दरवाजांमधून एकाचवेळी पाणी सोडण्यात आलं आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने 52 दरवाजे एकाचवेळी उघडण्यात आले आहेत. दारणा धरणातून 14 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दारणा धरणातील हे पाणी गोदावरी नदीत जातं. त्यामुळे सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.