AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती म्हणजे काय सोयरिक आहे का? राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीवर सदावर्तेंची बोचरी टीका!

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

युती म्हणजे काय सोयरिक आहे का? राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीवर सदावर्तेंची बोचरी टीका!
gunratna sadavarteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 16, 2025 | 12:23 AM
Share

BMC Election : राज्यात आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार राज्यात 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमदेखील इतर महापालिकांसोबतच असणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जाहीर होताच आता राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचीदेखील चांगलीच चर्चा चाल आहे. याच युतीवर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत ठाकरे बंधुंचा समाचार घेतला आहे.

लोकाशाहीचा उत्सव चालू झाला

महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने मुंबईकरांसमोर एक संधी आली आहे. आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे, असे म्हणत जास्तीत जास्त नागरिक या मध्ये सहभाग घेतील अशी अपेक्षा गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली.

राज, उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावर यावेळी मतदान होणार नाही

विरोधकांकडून मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला असा दावा केला जातो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तसा दावा केला आहे. याच मुद्द्यावर बोलताना सदावर्ते यांनी ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या बोलण्यावर मतदान होणार नाही. मुंबईकरांच्या विकासासाठी मतदान होईल. मुंबईच्या राजकारणाचा चेहरा नव्हे तर पूर्ण गणितच यावेळी बदललेले आहे. ही लोकांच्या मनातली गोष्ट आहे. सेल्फ डेवलपमेंट किंवा ओसी नसलेल्या घरांचा प्रश्न असेल, यावर महायुती काम करत आहे. सिडकोच्या घरांची किंमत दहा टक्क्यांनी कमी झालेली आहे, असे मत सतावर्ते यांनी व्यक्त केले.

युती म्हणजे काय…

पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा वैचारिक डीएनए लोकांनी पहिला आहे. ते दम येईपर्यंत माझे मनसैनिक असे म्हणतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चालणारे गणित नाही. ते सखे भाऊ नव्हेत. ते चुलत भाऊ आहेत. युती काय सोयरीक आहे का? दोघांकडे पण काहीच नाहीये, असा हल्लाबोल सदावर्ते यांनी केला.

Follow Us
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
Pratap Sarnaik | ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट, 24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या आधीच... अकोल्यात घडलं असं काही की...
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
Amravati | वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी सर्वात मोठी माहिती; अमरावतीत नेमकं काय घडतंय?
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका काय?
मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
Pune Hinjewadi | हिंजवडीत ड्रंक अँड ड्राइव्हचा कहर; मद्यधुंद तरुणाच्या भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाकांसह...
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
NEET Paper Leak | नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिवसांवरच आली असता...
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...