Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या

| Updated on: Jun 11, 2023 | 9:13 AM

Navi mumbai international airport कधीपर्यंत सुरु होणार? नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे काय फायदा होणार? सध्या मुंबई विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता काय आहे? जाणून घ्या.

Navi mumbai international airport ला मुंबईकर कितीवेळात पोहोचणार? पुणेकरांना किती वेळ लागणार? जाणून घ्या
Airport (Representative photo)
Follow us on

नवी मुंबई : मागच्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत हा विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्रासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा गेम चेंजर ठरणार आहे. नवी मुंबई विमानतळाच पहिलं टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. मूळ योजनेपक्षा दुप्पट प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे.

सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा सर्व भार मुंबई विमानतळावर आहे. जागेची कमतरता ही मुंबई विमानतळाची सर्वात मोठी समस्या आहे.

मुंबई विमानतळाची सध्याची क्षमता काय?

मुंबई विमानतळावरुन दरवर्षाला 4.8 कोटी प्रवासी प्रवास करतात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधलं जाणार आहे.

जागतिक स्टॅण्डर्डनुसार विमानतळावर पोहोचायला किती वेळ लागला पाहिजे?

जागतिक स्टॅण्डर्डनुसार, शहरातील कुठल्याही प्रवाशाला डोमॅस्टिक विमानतळावर 45 ते 90 मिनिटात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी टर्मिनलला 60 ते 120 मिनिटात पोहोचता आलं पाहिजे. मुंबई जवळच्या शहरातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुम्ही किती मिनिटात पोहोचू शकता त्याबद्दल जाणून घेऊया.

पुण्यावरुन किती वेळ लागणार?

पुण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 2 तास लागणार.

ठाण्यावरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी 45 मिनिट लागणार.

मुंबईवरुन पोहोचण्यासाठी 1 तास लागणार.

अलिबागवरुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी दीडतास लागेल.

मुंबई महानगर क्षेत्रात किती गावं आणि किती महापालिका?

मुंबई महानगर क्षेत्र 6,640 Sq Km मध्ये पसरलं आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पनवेल या नऊ महापालिका या क्षेत्रात येतात. अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, माथेरान, कर्जतस खोपोली, पेण, उरण, आणि अलिबाग या नऊ नगरपालिका यामध्ये मोडतात. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 1000 गाव या मुंबई महानर क्षेत्रात येतात.