AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? दोन जिल्ह्यांत पाण्यावरुन वाद

ahmednagar news : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका आतापासून दिसू लागला आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा अपूर्ण आहे. यामुळे पाण्यावरुन दोन जिल्ह्यांत वाद सुरु झाला आहे. अहमदरनगर आणि छत्रपती संभीजनगर या दोन जिल्ह्यात पाणी सोडण्याचा वाद होत आहे.

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? दोन जिल्ह्यांत पाण्यावरुन वाद
jayakwadi damImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 08, 2023 | 8:52 AM
Share

कुणाल जयकर, शिर्डी, अहमदनगर | 8 नोव्हेंबर 2023 : यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. राज्यातील अनेक प्रकल्प भरले नाही. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यांपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातील पाण्यासाठी पहिले आरक्षण पिण्यासाठी पाण्याचे आहे. त्यानंतर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगाम समाधानकारक झाला नाही. यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु राज्यातील दोन जिल्ह्यात पाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाणी छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीत पाणीप्रश्न पेटणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत नगर आणि नाशिकमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु या निर्णयास नाशिक आणि नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडले तर नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.

खासदार लोखंडे यांनी घेतली बैठक

अहमदनगरमधील निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेले पाणी अद्याप अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहे. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जायकवाडीला पाणी सोडणार असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली. या बैठकीत नगरमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला.

तो कायदा अन्यायकारक

समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 साली झालेला आहे. हा कायदा म्हणजे काळा कायदा आहे. नगर नाशिकवर यामुळे अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा