Ashwini Paul: नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी मारुन स्वत:सह लेकरांना संपवणाऱ्या अश्विनी पौळ प्रकरणात मोठी अपडेट
Wrestler Ashwini Paul Naldurg Fort : राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली. याप्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.

राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पोळ यांनी परवा टोकाचे पाऊल उचलले. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून आपल्या तीन लहान मुलांसह त्यांनी 100 फूट खोल दरीत उडी घतेली. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत अश्विनी पोळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य जागीच ठार झाले तर जुळ्या मुलींपैकी क्रांती हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी वीरा ही गंभीर असून तिच्यावर धारशिव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिच्या वडीलांनी पती आणि सासरकडील मंडळींविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यांच्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणात आता पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
नवऱ्यासह सासऱ्याला पोलिसांनी केली अटक
कुस्तीपटू अश्विनी पौळ आत्महत्या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये नवरा सासू सासरा आणि नणंद अशा चार जनावर ती नळदुर्ग पोलीस गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पती मनोहर अंकुश पौळ, सासरे अंकुश पंढरीनाथ पौळ यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अश्विनी पौळ यांच्या वडील तानाजी मोहिते यांनी काल पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. ते पेशाने शिक्षक आहेत.
उमरगा तालुक्यावर शोककळा
अश्विनी पौळ या राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट महिला कुस्तीपटू होत्या. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रात त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले होते. उमरगा तालुक्यातील व्हंताळ हे त्यांचे माहेर आहे. नळदुर्ग किल्ल्यावरील उपळी बुरूजावरून उडी मारून त्यांनी जीवन संपवले. तेजस्विनी मोहिते आणि आश्विनी मोहिते-पौळ या दोघी बहिणी लहानपणापासूनच कुस्तीचा फड गाजवत होत्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे व्हंताळ आणि माध्यमिक शिक्षण बलसूर येथे झाले होते. त्यांच्या वडीलांनी मुलींची कुस्तीची आवड पाहून मुलींना कुस्तीचे रीतसर धडे दिले होते.
अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावर पाच सुवर्ण आणि सहा रौप्य पदकांची कमाई केली होती. पण लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात कुरबुरी सुरू झाल्या. पुढे नवरा-बायकोत खटके उडायला लागले. गेल्या काही महिन्यांपासून त्या तणावाखाली होत्या. पतीच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबईत महाराष्ट्र सुरक्षा दलातील नोकरी सोडल्याचा आरोप तानाजी मोहिते यांनी केला. गेल्या तीन महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत होत्या.