AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितलं?; आघाडीत चाललंय काय?

निवडणुका आल्या की दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपकडून केले जाते. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे. कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, असं धनंजय मुंडे म्हणाले.

पुढचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? धनंजय मुंडे यांनी स्पष्टच सांगितलं?; आघाडीत चाललंय काय?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 10, 2023 | 11:58 AM
Share

बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. त्या दिशेने महाविकास आघाडीच्या जोरबैठकाही सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते बीडमध्ये मीडियाशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. धनंजय मुंडे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन स्वतः धनंजय मुंडे यांनी केले. तसेच मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शपथही दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याच्या विकासात राष्ट्रवादीचा वाटा

या 24 वर्षात राष्ट्रवादीला अनेक चढउतार बघावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस तब्बल साडे सतरा वर्ष सत्तेत होता. त्यामुळे मधल्या काळात राज्याचा जो विकास झाला त्यात राष्ट्रवादीचा सिंहाचा वाटा होता. ज्या ज्या वेळी सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा सामान्य माणसाचा आम्ही विकास केला. त्यामुळे राष्ट्रवादी हा आपला पक्ष असल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी सध्या महाराष्ट्रात एक नंबर आहेच. पण येत्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी शपथ आम्ही घेतली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही

महाराष्ट्राच्या लढाईत राष्ट्रवादी एक नंबरला राहील. पण येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं देशातील राजकारणातील महत्त्व वाढणार आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीत युवक आणि युवकांचे प्रतिनिधी अधिक आहेत. हा तरुणांचा पक्ष आहे. बहुसंख्य तरुणाई राष्ट्रवादीत आहे. लोकप्रतिनिधीही तरुणच आहे. पवारांच्या नेतृत्वाखालील तरुणांचा आणि तरुण पक्ष आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीशिवाय राज्याला पर्याय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

तर आम्हीही उत्तर देऊ

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दाभोलकर यांच्या प्रकारेच पवार यांना मारू अशी धमकी देण्यात आली. त्याचा अर्थ भारतीय जनता पार्टीने दाभोलकर यांच्या हत्येची जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या पक्षातील लोक आमच्या नेतृत्वाला धमक्या देत असतील तर आम्ही देखील त्याला उत्तर देण्यास सक्षम आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.