AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक, वीज निर्मिती केंद्रांना फटका

विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कॉल फील मध्ये पावसाचे पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटका महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे.

भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक, वीज निर्मिती केंद्रांना फटका
bhusaval thermal plant
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 9:00 AM
Share

जळगाव : विदर्भात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कॉल फील मध्ये पावसाचे पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी झाल्याने याचा फटका महानिर्मितीच्या वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 7 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित असताना केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दिपनगरमधील तीन पैकी एक वीज निर्मिती संच बंद करण्यात आला आहे, अशी माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे.

पावसाने कोळशाच्या खाणीत पाणी, कोळसा उत्पादनावर परिणाम

राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस सुरु असून विदर्भातील चंद्रपूर विभागात असलेल्या कोळशाच्या खाणीत पाणी शिरल्याने याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला आहे. विदर्भातील कोळशाच्या खाणी मधून वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. मात्र कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याने राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत आहे.

भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक

भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 1लाख 12 हजार मेट्रिक टन असा 7 दिवसांचा कोळसा साठा अपेक्षित असताना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संचापैकी 210 मेगावॅटचा संच बंद करण्यात आला आहे.

कोळसा पुरवठा खंडित झाल्यास वीज निर्मिती ठप्प होण्याच धोका

दरम्यान, दररोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्तास तरी वीज निर्मितीवर परिणाम झाला नसला तरी एक दिवसही कोळसा पुरवठा खंडित झाल्यास दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती ठप्प होण्याचा धोका वाढला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा पाऊस?

दिनांक 23 सप्टेंबरः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 24 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 25 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 26 सप्टेंबर: जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 27 सप्टेंबर: औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

(One day coal reserves at Bhusawal thermal power plant, power plants hit)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...