AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुर्देव! महिला स्वच्छतागृहात गेली आणि संकट कोसळलं, कोल्हापुरातली वेदनादायी घटना

आपण कितपत सुरक्षित आहोत? हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. मरण खूप स्वस्त झालंय, असं म्हणतात. विशेष म्हणजे ही म्हण खरी ठरेल अशा घटना सध्या आजूबाजूला सहज घडताना देखील दिसत आहेत. कोल्हापुरात आज एक अशीच घटना घडली.

दुर्देव! महिला स्वच्छतागृहात गेली आणि संकट कोसळलं, कोल्हापुरातली वेदनादायी घटना
| Updated on: Jul 25, 2023 | 10:13 PM
Share

कोल्हापूर | 25 जुलै 2023 : माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे, असं म्हणतात. कारण जसं पाण्याच्या बुडबुड्याला फार आयुष्य नसतं. बुडबुडा लगेच पाण्यात विरघळून जातो. तशाच घटना या माणसासोबत होताना दिसत आहेत. आपल्यासोबत कधी काय होईल, याचा भरोसाच नाही. कुणाला कधी हृदयविकाराचा झटका येईल आणि त्याचं निधन होईल, याचा भरोसा नाही. तर कुणाचा रस्त्याने जाताना अपघातात मृत्यू होईल सांगता येणार नाही. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. एक महिला नाट्यगृहात कार्यक्रमासाठी गेली होती. या दरम्यान ही महिला नाट्यगृहाच्या स्वच्छतागृहात गेली पण त्यावेळी एक अतिशय अनपेक्षित अशी घटना घडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. अतिशय मन हेलावणारी ही घटना आहे.

कोल्हापुरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पावसाचा अंदाज पाहता प्रशासन देखील सतर्क झालं आहे. असं असताना कोल्हापुरात आज एक अनपेक्षित दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा हकनाक बळी गेला आहे. संबंधित महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोल्हापूरच्या खासबाग परिसरात संरक्षण भिंत कोसळली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरचं शाहू खासबाग मैदान हे ऐतिहासिक मैदान म्हणून ओळखलं जातं. या मैदानाची संरक्षण भिंत आज संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या संरक्षण भिंतीला लागून केशवराव भोसले नाट्यगृहाचं स्वच्छतागृह होतं. या स्वच्छतागृहात गेलेल्या दोन महिला या संरक्षण भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. अखेर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

संबंधित घटनेची माहिती मिळताच अग्मिशन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून ढिगारा बाजूला सारण्याचं काम तातडीने सुरु करण्यात आलं. अग्निशन दलाच्या जवानांनी पडलेल्या भिंतीचे अवशेष बाजूला केले. या कामासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना थोडा वेळ लागला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांनी जोपर्यंत मलबा बाजूला केला तोपर्यंत उशिर झाला होता. स्वच्छतागृहात गेलेल्या एका महिलेचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त केला जातोय. अश्विनी यादव असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. मृत महिला कोल्हापुरातील भोसलेवाडी परिसरात वास्तव्यास होती. महिला एका कार्यक्रमासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात आली होती. या दरम्यान तिच्यासोबत ही दुर्देवी दुर्घटना घडली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.