AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; ‘या’ मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; 'या' मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 17, 2023 | 6:15 PM
Share

पालघर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच शिवसेना आणि ठाकरे गट आता आमनेसामने आले आहेत. संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर टीका केली जात असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणला जाऊ शकतो अशी शक्यता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, लोकशाही राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल किंवा विनाकारण कोणाला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो.

त्यामुळे त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात असं सूचक वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अब्दुल सत्तार आज पालघरमध्ये आले असताना बोलत होते. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याची चर्चाही सुरू असल्याबाबत अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आधी प्रति एकरीमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे.

त्यामुळे त्यावर सरकर ही सकारात्मक असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार आज पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं .

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं आहे.

तसंच पालघरमध्ये युरिया खताचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?