AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; ‘या’ मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

ठरलं..! संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणणार; 'या' मंत्र्याने संदर्भासह कारणही स्पष्ट करून सांगितलं
| Updated on: May 17, 2023 | 6:15 PM
Share

पालघर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरूनच शिवसेना आणि ठाकरे गट आता आमनेसामने आले आहेत. संजय राऊत यांच्याकडून शिवसेनेवर टीका केली जात असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणला जाऊ शकतो अशी शक्यता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, लोकशाही राज्यात कोणीही कोणाच्या हक्कांवर गदा आणत असेल किंवा विनाकारण कोणाला बदनाम करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग आणला जातो.

त्यामुळे त्या पद्धतीची पुढील कार्यवाही विधानसभेचे अध्यक्ष करतात असं सूचक वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

अब्दुल सत्तार आज पालघरमध्ये आले असताना बोलत होते. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात 50 आमदार हक्कभंग आणणार असल्याची चर्चाही सुरू असल्याबाबत अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आधी प्रति एकरीमागे दहा हजार रुपये देण्याचा निकष विभागीय आयुक्तांकडून सरकारला देण्यात आला आहे.

त्यामुळे त्यावर सरकर ही सकारात्मक असल्याचे मत राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. अब्दुल सत्तार आज पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे शेतकरी मेळाव्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 25 पेक्षा अधिक उपायोजना करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं .

हे सरकार बळीराजाचं सरकार असून पालघरमध्ये मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला न देताच त्यांना बेघर केल्याच्या घटनेवरही सत्तार यांनी बोट ठेवलं आहे.

याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं आहे.

तसंच पालघरमध्ये युरिया खताचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.