AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Accident : वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कारकडून तीन अपघात; एक मृत्यू, दोन जखमी

ज्या इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत अपघात केला आहे, त्या कारमध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची ही कार असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे.

Vasai Accident : वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कारकडून तीन अपघात; एक मृत्यू, दोन जखमी
वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कारकडून तीन अपघातImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jun 24, 2022 | 3:17 AM
Share

वसई : वसईत महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावलेल्या इनोव्हा कार (Innova Car)ने तीन अपघात (Accident) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत गोखीवरे ते मधूबनपर्यंत गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास तीन अपघात केले आहेत. या अपघातात एका महिलेचा मृत्यू (Death) झाला असून 2 जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्या इनोव्हा कार चालकाने दारूच्या नशेत अपघात केला आहे, त्या कारमध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग असे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या अधिकारी किंवा कर्मचारी यांची ही कार असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. अपघातानंतर मद्यधुंद कारचा चालक आणि गाडीतील अन्य 2 जण तात्काळ फरार झाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

अपघातानंतर कार चालक फरार

वसईच्या वालीव पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीचा ताबा घेऊन ती गाडी मुख्य रस्त्यावरून बाजूला केली. पण महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लिहिलेल्या कार दारू पिऊन चालवणारा चालक आणि त्यामधील अन्य दोन फरार झालेल्यांचा पोलीस शोध घेत आहेत. शासनाचा बोर्ड लावूनच दारू पिऊन गाडी चालवत लोकांचा अपघात करत असतील तर यात मयत किंवा जखमी झालेल्या व्यक्तीला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. आता वालीव पोलीस यात काय कारवाई करतात की शासनाची कार असल्याने सोडून देतात हे पाहणे महत्वाचे आहे. (The driver of the Innova car blew up the three in Vasai)

Follow Us
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार