AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola school : अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं, सहा महिने झाले तरी दुरुस्ती नाही, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!

28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करून छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत.

Akola school : अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं, सहा महिने झाले तरी दुरुस्ती नाही, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे!
अकोल्यातील शाळेत वादळात छत उडालं
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 04, 2022 | 11:38 PM
Share

अकोला : अकोला जिल्हातल्या बाळापूर (Balapur) तालुक्यातील रिधोरा येथे वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. 28 डिसेंबर 2021 ला वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करुन छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेला हाल सोसावे लागत आहेत. शाळेवरील पत्रे उडाल्याने शाळेला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापक (Headmaster) आणि शाळा समितीने जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही समस्या दूर झालेली नाही. जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावात 125 वर्षे जुनी जिल्हा परिषद शाळा आहे. ही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. 228 इतकी शाळेची पटसंख्या आहे. उन्हाळी सुट्ट्या आणि कोरोनामुळे यंदा शाळा उशिराने सुरू झाल्या. उत्साही वातावरणात विद्यार्थी शाळेत आले. पण, त्यांची निराशा झाल्याचं दिसून येते.

वादळी पावसात उडाली पत्रे

एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांची बकाल अवस्था झाल्याचे पहायला मिळत आहे. शाळेच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नसल्याने अशा बकाल शाळेतच विद्यार्थांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील रिधोरा गावातील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे सहा महिन्यांपूर्वी वादळी पावसात उडून गेले होते. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची डागडूजी आवश्यक होती. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थी छत नसलेल्या शाळेच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शाळेचे मुख्याध्यापक परमानंद थोटे हेही हतबल झाले आहेत.

सहा महिन्यांपासून छत नाही

शाळेवरील कोसळलेल्या छताखाली विद्यार्थांना बसावे लागले आहे. 28 डिसेंबर 2021 ला वादळी पावसाने शाळेची हालत खराब केली. वादळी वाऱ्याने शाळेवरील छत उडाले. तेव्हापासून ते आतापर्यंत याची दुरस्ती करून छत बसवण्यात आले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषद शाळेला हाल सोसावे लागत आहेत. याबाबत शाळा समितीचे अध्यक्ष अनिल दंदी यांनी वारंवार जिल्हा परिषदेला निवेदन दिली. आतापर्यंत समस्या दूर झाल्या नाहीत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप गावातील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी केला. लवकरात लवकर शाळेची डागडुजी करुन गळती थांबविण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?