AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागलीय, काय म्हणाले उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली, जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीनसारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागलीय, काय म्हणाले उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 19, 2025 | 8:45 PM
Share

दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा आज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झाला. उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आज षन्मुखानंद सभागृहात झाला. या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पनवतीच लागली असल्याची बोचरी टीका शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत…

आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला.रेल्वे अपघात झाला पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मेट्रोत पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपाला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची गरज नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंह यांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे ? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात असा टोमणा मारला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की निवडणूक जिंकण्यासाठी हे माता भगिनीशी केलेला वादा. जनतेशी केलेला वादा पाळत नाहीत. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळेल. अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता असे म्हणता. मग माता भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता ? असाही हल्ला त्यांनी केला.

पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य नाही

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारतोय. आता पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य होत नाही. इंडिया आघाडी आम्ही उभी केली तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर तुम्ही आमची तुलना करायला गेलात तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही. जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदीेची गद्दारांशी भेट का?
Uddhav Thackeray | सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना मोदीेची गद्दारांशी भेट का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत...
राष्ट्रवादीत मोठा बदल होणार? सुनेत्रा पवार- प्रशांत किशोर भेटीबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान
फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!
Uddhav Thackeray | फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणायचे, आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात!; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरे एका वाक्यातच म्हणाले
ही वादळापूर्वीची शांतता, नंतर... उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच दिली कोर्टातील सुनावणीबाबत मोठी प्रतिक्रिया
आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... PM मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
PM Narendra Modi Live: आयुष्यात कोणताही ठराविक कोर्स... IIT दिल्लीत पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र
उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
Umesh Patil on NCP | दादांनी उभ्या केलेल्या पक्षाच्या फांदीवर कुऱ्हाड चालवण्यात...; उमेश पाटलांच्या एका पोस्टने वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
शरद पवार गटाची मोठी खेळी? सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार...
मोठी बातमी! शरद पवार गटाची मोठी खेळी? सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सर्व खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; घेणार मोठा निर्णय!
दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा...
Harshwardhan Sapkal | दिलगीरी ट्वीट नंतर मी सुनेत्रा पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र... सपकाळ नेमकं काय म्हणाले?
प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती...
Rupali Thombre Patil | प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती; रुपाली ठोंबरे यांच्या दाव्याने राष्ट्रवादीत खळबळ!
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपद...
दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना फोन, इकडे मुखाग्नी दुसरीकडे मंत्रीपदासाठी... NCP तील नेत्याने अखेर सांगितलंच