AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिन पगारी आणि फुल्ल अधिकारी….अशी गत कुणाची झाली ?

सद्रक्षणाय खलनिग्रणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे.

बिन पगारी आणि फुल्ल अधिकारी....अशी गत कुणाची झाली ?
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
| Updated on: Sep 07, 2022 | 3:35 PM
Share

नाशिक – सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुव्यवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे. सहा महिने उलटले तरी शासनाकडून त्यांना मिळणारे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आलेले नाहीत. राज्याची पोलीस पाटील संघटना याबाबत राज्यातील पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत आहे.

  1. गावखेड्यात छोटे-मोठे तंटे, हाणामाऱ्या आणि इतर वादविवाद गावातच मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्वाची भूमिका बजावत असतात.
  2. आरक्षणाच्या नव्या धोरणानुसार पोलीस पाटील हे पद देण्यात आले आहे.
  3. 2012 पासून पोलीस पाटलांना प्रवास भत्ताही देण्यात आलेला नसून मानधन वाढवून देण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेनं केली आहे.
  4. सध्या पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये इतके मानधन असून 24 तास कर्त्यव्य बजावण्यासाठी सतर्क राहावे लागत आहे.
  5. तालुक्याच्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना गावांचं वाटप केलेलं असतं. त्यात पोलीस पाटील महत्वाचं कार्य करतात.
  6. पोलिसांना गावखेड्याच्या कामात हातभार लागावा, योग्य माहिती वेळेत मिळावी यासाठी पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात.
  7. कोरोनाकाळात केलेल्या अतिरिक्त कामांचे मानधन अजूनही मिळालेले नाही, सणासुदीच्या काळातही मानधन प्राप्त न झाल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजीचा सूर आहे.

“जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पोलीस पाटील संघटना ठिकठिकाणी निवेदन देत आहे. 2012 पासून प्रवासभत्ता मिळालेला नाही. सहा महिने झाले अजूनही मानधन नाही. सणासुदीच्या काळात तरी मानधन मिळायला हवे होते पण ते मिळाले नाही. त्यामुळे पोलीस पाटील हे गावखेड्यात काम कसे करणार ?” दीपक पालीवाल, अध्यक्ष ( पोलीस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य )

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.