AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपसमोर विधानसभेत 33 मतदारसंघात अडचण, कारण…’, राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा

"आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर ३३ मतदारसंघात अडचण निर्माण होवू शकते. कारण गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांपैकी २९ जागा भाजपने राष्ट्रवादी समोरच्या जिंकल्या आहेत", असा दावा राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी केला आहे.

'भाजपसमोर विधानसभेत 33 मतदारसंघात अडचण, कारण...', राजकीय विश्लेषकाचा मोठा दावा
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 27, 2024 | 9:50 PM
Share

राज्यात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विचित्र आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षांचा एक गट सत्तेत तर दुसरा गट विरोधात आहेत. त्यामुळे या दोन पक्षांपासून चार पक्षांची निर्मिती झाली आहे. या राजकीय परिस्थितीमुळे विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अर्थात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच, पण या निवडणुकीत आहे तशी राजकीय परिस्थिती असल्यास प्रचारादरम्यान नैतिक आणि अनैतिकतेच्या मुद्द्यावरुन आरोप-प्रत्यारोप केले जाऊ शकतात. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्या पक्षाकडे किती जागांवर आव्हान आहे, याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होती. पण तरीदेखील दोन्ही पक्षांनी प्रत्येक मतदारसंघात बंडखोर उभे केले होते. त्याचा फटका त्यांना काही मतदारसंघांमध्ये बसला. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी जास्त आग्रही राहिले. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती अधिकृतपणे तुटली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. पण हे सरकार अवघ्या अडीच वर्षात कोसळलं. यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलत गेली. या राजकीय परिस्थितीमुळे मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी महत्त्वाचं विश्लेषण केलं आहे.

राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर काय म्हणाले?

राजकीय विश्लेषक प्रशांत आहेर यांनी मोठा दावा केला आहे. “आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर ३३ मतदारसंघात अडचण निर्माण होवू शकते. कारण गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १०५ जागांपैकी २९ जागा भाजपने राष्ट्रवादी समोरच्या जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या ५४ जागांपैकी २५ जागा या राष्ट्रवादी शरद पवार गटासमोर समोर आहेत. भाजप समोर ३३ जागांवर अडचणी आहेत. त्यामुळे शरद पवारांनी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. भाजप नेते समरजीत घाडगे हे त्याचंच उदाहरण आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याशी पण संपर्क केला. हर्षवर्धन पाटील पक्षात जाणार नाहीत. मात्र अपक्ष निवडणूक लढवू शकतात. २००४ ला राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होवू शकते”, असा मोठा दावा प्रशांत आहेर यांनी केला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.