AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेतून असावं, हिंदी की स्थानिक? आरएसएसची पहिली प्रतिक्रिया समोर

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं, त्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केले. या सर्व पार्श्वभूमीवर आता आरएसएसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेतून असावं, हिंदी की स्थानिक? आरएसएसची पहिली प्रतिक्रिया समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2025 | 5:35 PM
Share

राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, अशी भूमिका अनेक पक्षांची आणि संघटनांची होती. याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिक घेत आंदोलन उभारलं, त्यानंतर या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटानं देखील उडी घेतली. मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता, मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील आपले दोन्ही निर्णय मागे घेतले.

दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयानंतर शनिवारी मुंबईमध्ये विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होती.  दरम्यान आता प्राथमिक शिक्षण कोणत्या भाषेत असावं? यावर आरएसएसनं पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत संघाची भूमिका मांडली आहे.

नेमकं काय म्हणाले आंबेकर? 

भारताच्या सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत, अस संघ मानतो, आपल्या आपल्या राज्यात लोक त्याच भाषेत बोलतात. आम्ही नेहमी म्हणतो की आप आपल्या राज्यात स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावं, हे संघ पहिल्यापासून सांगतोय त्यामुळ हेच संघाचं मत आहे, असं आंबेकर यांनी म्हटलं आहे. त्या- त्या राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावं, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.

जीआर रद्द 

दरम्यान त्रिभाषा सूत्राबाबत राज्य सरकारकडून दोन जीआर काढण्यात आले होते. मात्र राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांची आणि संंघटनांची होती. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध वाढला होता.  याविरोधात पाच जुलै रोजी मोर्चा देखील निघणार होता. मात्र त्यापूर्वीच सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय मागे घेतले आहेत.

त्यानंतर सरकारने नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीचा निर्णय आल्यानंतरच आता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे स्थानिक भाषेतच प्राथमिक शिक्षण असावं, अशी भूमिका संघानं देखील मांडली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.