AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही कुत्रा असेल तर संजय राऊत… अब्दुल सत्तार यांची जहरी टीका, काय म्हणाले सत्तार…

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जहरी टीका केली आहे. थेट संजय राऊत यांना महाकुत्रा म्हणत घणाघाती टीका केली आहे.

आम्ही कुत्रा असेल तर संजय राऊत... अब्दुल सत्तार यांची जहरी टीका, काय म्हणाले सत्तार...
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: May 08, 2023 | 2:09 PM
Share

पुणे : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर शिंदे सेनेच्या वतीने जोरदार टीका केली जात आहे. संजय राऊत यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खुलं आव्हान दिलं आहे. आमच्या मतांवर निवडून येणारा आम्हाला कुत्रा म्हणतो पण तो महाकुत्रा आहे अशी जहरी टीका अब्दुल सत्तार यांनी केला आहे. पुणे येथे बोलत असतांना अब्दुल सत्तार यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी गारपीटीबाबतही भाष्य केलं आहे. अब्दुल सत्तार म्हणाले, गेल्या काळात 5-7 वेळा गारपीट झाली आहे. 82 टक्के पंचनामे झाले आहेत. आणखी 4 दिवस पाऊस पडणार आहेत. हे अस्मानी संकट आहे, कोणीही राजकारण करू नये. बदलत्या हवामानाप्रमाणे नवीन काही पीक घेता येईल का यावर विचार सुरू आहे अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मी सोडून आलोय, हे मी येताना त्यांनी पाहिले नाही. माझा इतका कोणताच कृषिमंत्री फिरला नाही. संजय राऊत यांचं दुखणं वेगळं आहे, ते कधीच बांधावर जात नाही. त्यांना बांध माहित असला असता तर बांध फुटला नसता तर 40 आमदार गेले नसते अशी खोचक टीकाही अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.

आम्ही कुत्रा असेल तर आमच्या मतावर तो निवडून आला आहे. आम्ही त्याला राज्यसभेवर पाठवलं आहे. कुत्र्याची अवस्था त्याची झालेली आहे. जो आम्हाला कुत्रा म्हणतो तोच आधी कुत्रा आहे असे म्हणत तो महाकुत्रा असल्याची टीका अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.

रोज सकाळी उठतो आणि भुंकतो, त्याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतं. आमच्या मतावर तो राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा आहे. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा द्यावा तो कसा आहे ते कळेल त्याने राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल असेही सत्तार यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं मी राजीनामा देईन. सामना का वाचावा पाच दहा रुपये खर्च करून ज्यात तथ्य सत्य नाही ते का वाचावे. आम्हाला बंद करायचं होत हे जर कळलं असतं तर बिस्मिल्ला केला असता तर त्याला कोणी विचारलं असतं का? असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे.

धाकधूक आम्हाला नाही, धाकधूक त्यांना आहे. जसा निकाल लागेल तसे ते सगळे चालले जातील. चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करत आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्ही सन्मानाने स्वीकारू असेही अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.