AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख भाजपवर, राष्ट्रवादीवर नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण

Ambadas Danve on Saamana Editorial : शरद पवार यांचा राजीनामा, सामनाचा अग्रलेख अन् चर्चा; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण

संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख भाजपवर, राष्ट्रवादीवर नाही; ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण
| Updated on: May 08, 2023 | 1:41 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच!, या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. सामनाच्या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार यांनीही अग्रलेखावर प्रतिक्रिया दिला आहे. या अग्रलेखावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले…

संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख हा भारतीय जनता पार्टीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरती लिहिलेला नाही. सामना हे वृत्तपत्र आहे. त्यात काय लिहायचं आणि काय नाही लिहायचं हा अधिकार संपादकांचा आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

पाठीमागे संजय राऊत यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का? असा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळेला छगन भुजबळ का नाही बोलले? महाविकास आघाडी बनवण्यात संजय राऊत यांचा रोल खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. संजय राऊत आणि राष्ट्रवादी अशी कोणतीही धुसफूस सुरू नाहीये. संजय राऊत इतकंच म्हणाले होते की, शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, अत्यंत सकारात्मकपणे संजय राऊत शरद पवारांबद्दल आपली मतं मांडतात, असंही दानवे म्हणालेत.

सामनावर शरद पवार काय म्हणाले?

सामनाचा आजचा अग्रलेख मी काही वाचला नाही. वाचल्यावर यावर मी माझं मत देईल. सामना किंवा त्यांचे संपादक आम्ही एकत्र काम करत असतो. पण संपूर्ण माहिती घेऊन नंतरच त्यावर भाष्य करणं, योग्य राहील. नाहीतर उगीच गैरसमज होतात. माझी खात्री आहे, त्यांची भूमिका ऐक्याला पूरक असेल, असं शरद पवार म्हणालेत.

आजच्या सामनात नेमकं काय?

भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण?, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलंय.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.