AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PDCC Bank Election: एका जागेचं वाईट वाटतंय, पुणे जिल्हा बँकेच्या विजयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे.

PDCC Bank Election: एका जागेचं वाईट वाटतंय, पुणे जिल्हा बँकेच्या विजयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
ajit pawar
| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 2:04 PM
Share

पुणे: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ज्या जागेसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपाटले होते, त्याच जागेवर राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आहे. अजित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या निकालावर व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एका जागेवर झालेल्या पराभवावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडून आलेल्यांचं स्वागत करतो. एका ठिकाणी का आम्ही कमी पडलो याची बारकाईने माहिती घेतो. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असं अजितदादा म्हणाले. तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही एक पक्ष म्हणून निवडणूक नव्हती, पक्ष विरहित निवडणूक होती. पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.

आढळरावांचा गैरसमज दूर केला असता

आढळराव पाटलांनी माझ्याशी चर्चा केली असती तर मी त्यांच्याशी बोललो असतो, काही गैरसमज असतील तर दूर केले असते, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

मला काय विचारता?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं किंवा महाराष्ट्रात कुणी काही म्हटलं त्यावर मला का विचारता? असा सवालच त्यांनी केला.

पराभव का जिव्हारी लागला?

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरल्याने अजितदादांना हा पराभव जिव्हारी लागला आहे.

संबंधित बातम्या:

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बँक अजितदादांच्या खिशात, एक जागा गमावली, कारण बारामतीतच 52 मतं फुटली

PDCC Bank Election | अजितदादांनी ज्या प्रदीप कंद यांना ‘जागा दाखवण्यासाठी’ दंड थोपटले, त्यांनीच निवडणुकीत ‘जागा’ जिंकली

PDCC Bank Election: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी तीन जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात, इतर जागांची मतमोजणी सुरू

Follow Us
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार