Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक

| Updated on: Apr 09, 2022 | 11:24 AM

राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे.

Video : उन्हाचा तडाखा गुरांनाही! राजगुरूनगरात शेतकऱ्यानं जनावरांसाठी ठेवलेलं वैरण जळून खाक
राजगुरूनगरात वैरणाला लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशामक दल
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : राज्यात उष्णतेने (Heat) नागरिकांना हैराण केले असताना याचा फटका आता शेतकऱ्यांना (Farmers) ही बसत आहे, दुपारच्या वेळी पडलेल्या उन्हामुळे राजगुरूनगर (Rajguru nagar) येथील एका शेतकऱ्याने जनावरांसाठी ठेवलेला चारा, वैरण जळून खाक झाले आहे. घटनास्थळी राजगुरूनगर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण आणले. मात्र चाऱ्याला लागलेली आग आटोक्यात आणताना भिजल्याने संपूर्ण खराब झाला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना नेहमीच सहन करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस तर कधी जास्त थंडी तर कधी उन्हाचा चटका… यामुळे पीकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो. आता पीकांसोबत वैरण म्हणजेच गुरांना खाण्यासाठीचा चाराही यालाही उन्हाचा फटका बसला आहे.

वाढत्या उन्हामुळे घडली घटना

शेतात शेतकऱ्यांनी गुरांसाठी वैरण ठेवलेले असते. सध्या प्रचंड ऊन वाढले आहे, काही ठिकाणचा पारा 40-42 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेला आहे. माणसांनाही या उन्हाचा तडाखा बसला आहे, तिथे गुरांची परिस्थिती वेगळी काय असेल? गुरांसाठीचे वैरण शेतकऱ्यांनी शेतातच वेगळे ठेवलेले असते. त्याला आग लागली.

वैरण भिजले

अग्निशामक दलाला बोलावून आग काही प्रमाणात विझवली खरी, मात्र पाण्याचा मारा केल्याने वैरण भिजले आहे. त्यामुळे ते पूर्ण खराब झाले आहे. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आणखी वाचा :

Pune : जमीन संपादनाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

दिघीत सापडले तब्बल 12 डुक्कर बॉम्ब! दोन महिन्यापूर्वी बालिकेचा झाला होता मृत्यू