AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे शहरात विदेशी कंपनीचा येणार मोठा प्रकल्प, चार हजार कोटींची गुंतवणूक

Hyundai Company Invest In Pune : राज्यात गुंतवणुकीवरुन दोन सरकारमध्ये काही महिनांवरुन वाद झाला होता. आता राज्यात मोठी गुंतवणूक येणार आहे. पुणे शहरात चार हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून चांगली रोजगारनिर्मिती होईल.

पुणे शहरात विदेशी कंपनीचा येणार मोठा प्रकल्प, चार हजार कोटींची गुंतवणूक
InvestmentImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 13, 2023 | 7:38 AM
Share

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : राज्यातील गुंतवणुकीवरुन काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी आणि युती सरकारमध्ये आरोप, प्रत्यारोप झाले होते. वेदांता फॅाक्सकॅान, एअरबस प्रकल्प, सॅफ्रन प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क हे चार प्रकल्प गेल्या वर्षभरात राज्याकडून निसटले. त्यास कोणते सरकार जबबादर होते, हा वाद रंगला होता. त्यानंतर त्यावर श्वेतपत्रिका काढण्यात आली होती. ही श्वेतपत्रिका पावसाळी अधिवेशनात मांडली गेली. यामध्ये हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले हे मांडण्यात आले. आता राज्यात गुंतवणूक पर्व सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरात गुंतवणूक आली आहे.

कोणती कंपनी करणार गुंतवणूक

वाहन निर्मिती क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी ‘ह्युंदाई’ ने भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी राज्यातील पुणे शहरामध्ये गुंतवणूक करणार आहे. दोन टप्प्यांत ही गुंतवणूक केली जाणार आहे. एकूण पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ह्युंदाई कंपनीचे पुरवठादारही पुण्यात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

काय म्हणाले उदय सामंत

पुणे शहरात ह्युंदाई कंपनी व्यतीरिक्त ‘एलजी’ कंपनी आपला विस्तार करणार आहे. एलची कंपनी सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ‘ह्युंदाई’ कंपनीच्या गुंतवणुकीमुळे पुणे शहरात चार हजार ५०० जणांना रोजगार मिळणार आहे. ही कंपनी २०२८ पर्यंत गुंतवणूक करणार आहे. ‘लोट्टे वेलफूड’ ही कंपनी त्यांच्या पुणे येथील प्रकल्पात ४७५ कोटी रुपये गुंतवणार आहे. ही कंपनी हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन करणार आहे.

राज्याचे शिष्टमंडळ गेले होते विदेशात

राज्याचे शिष्टमंडळ दक्षिण कोरियात गेले होते. त्यावेळी अनेक कंपन्यांशी चर्चा झाली आहे. त्यातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. दक्षिण कोरियाचे एक शिष्टमंडळ लवकरच राज्यात येणार आहे. त्यावेळी अनेक करार होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. राज्यात गुंतवणूक करण्यास अनेक कंपन्या तयार आहेत. यामुळे येत्या काळात राज्यात मोठी गुंतवणूक प्रकल्प येतील आणि रोजगार निर्मिती होईल, असे सामंत यांनी सांगितले.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?