AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल हाती येणार आहेत. या पाचही राज्यात कुणाची सत्ता येईल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं.

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?
ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला? Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 2:22 PM
Share

पुणे: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल हाती येणार आहेत. या पाचही राज्यात कुणाची सत्ता येईल याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं. ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी काही माझी वाईट अवस्था झाली नाही. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही. बघुया काय होतं ते, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी हा टोला भाजपला (bjp) लगावल्याचं सांगितलं जात आहे. येत्या 7 मार्च रोजी उत्तर प्रदेशात (uttar pradesh) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर उत्तरप्रदेशसहीत पाचही राज्यांचे येत्या 10 मार्च रोजी निकाल लागणार आहेत. त्यानंतर या राज्यात कुणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहेत. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांना या पाच राज्यांच्या निकालावर भाष्य करणं टाळलं.

शरद पवार यांनी यावेळी नवाब मलिक यांना क्लिनचीट दिली. नवाब मलिक यांना राजकीय हेतूनेच अटक करण्यात आली आहे. ते गेल्या 20 वर्षांपासून विधानसभेत आहेत. त्यांच्यावर इतक्या वर्षात कधीच आरोप झाले नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.

तर तेलाच्या किंमती भडकतील

लिबीयाच्या युद्धावेळीही तत्कालीन सरकारला आपले नागरिक मायदेशात लवकर आणता आले नव्हते असा आरोप भाजपकडून होत आहे. त्याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. याबाबत सामान्य माणसाला प्रश्न विचारा. लिबीयाचा विषय कुणाला माहीतही नाही. तो लहान देश होता. युक्रेन-रशियातील स्थिती कितीतरी गंभीर आहे. त्यामुळे आपल्या मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या मुलांची जशी काळजी आहे, तशीच रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर काय परिणाम होणार याचीही मला चिंता लागली आहे. सूर्यफुल हे महत्त्वाचं खाद्य तेल देणारं पीक आहे. युक्रेनमध्ये त्याचं मोठं उत्पादन होतं. त्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किंमती वाढतील. त्याची झळ सामान्य लोकांना बसेल. त्यात केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

म्हणून रशिया किंवा युक्रेनची बाजू घेतली नाही

चीन आणि भारतने कुणाची बाजू घेतली नाही. नेहरूंच्या काळापासून आपलं ते धोरण आहे. संघर्षात आपण कुणाची बाजू घेत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी जी भूमिका घेतली त्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. या मुलांना बाहेर कसं आणता येईल हे पाहिलं पाहिजे. पुतिन यांच्याशी केंद्र सरकारने चर्चा केल्यानंतर पॅसेज खुला केल्याचं सांगितलं जातं. पण मुलं अडचणी सांगत आहेत. पॅसेज खुला केला, पण रशियाचा गोळीबार सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडता येत नसल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. शिवाय युक्रेनचे नागरीक भारतीय मुलांवर नाराज आहेत. तुमच्या देशाने ठोस भूमिका घेतली नसल्याचं ते सांगत आहेत, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा

नारायण राणे मालवणी पोलीस स्टेशनला पोहोचले; दिशा सालियन प्रकरणात आपली बाजू मांडणार

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...