AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे.

VIDEO: राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवाल
राणे साहेबांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का?; शरद पवारांचा भाजपला खरमरीत सवालImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 2:23 PM
Share

पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून (bjp) मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी फेटाळून लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे जुने सहकारी राणे साहेब यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला हे माझ्या पाहण्यात आलं नाही. उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा खुलासा करतील, असा टोला लगावतानाच एक न्याय राणेंना लावता अन् दुसरा न्याय मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी भाजपवर केली. शरद पवार हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक केली. गेली 20 वर्ष ते विधानसभेत आहेत. त्या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. आता त्यांचे संबंध दाऊदशी असल्याचा दिसतोय. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर त्याला दाऊदचा जोडीदार धरलं जातं. कारण नसताना आरोप केला जातो. मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावरही आरोप केले होते. हे लोक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मला चिंता करण्याचं कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांना यातना दिल्या जात आहेत. जाणूनबाजून हे केलं जातंय, असं शरद पवार म्हणाले.

ओबीसींसाठी सर्व काही करू

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात काय झालं मला माहीत नाही. कायदा केला असेल नसेल तरीही ओबीसींच्या हिश्याचं देण्यासाठी आम्ही जे जे करता येईल ते करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांबद्दल न बोललेचं बरं

पवारांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात सी. प्रकाश नावाचे राज्यपाल होते. त्यावेळी मी कार्यकर्ता होतो. नंतर मी पीसी अलेक्झांडर या राज्यपालांचं कामही पाहिलं. हे दोन्ही राज्यपाल कर्तृत्वान होते. पण आताचे राज्यपाल या यादीत कुठे दसित नाहीत. त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं, असा टोला पवार यांनी राज्यपालांना लगावला.

सत्ताधाऱ्यांनी विद्यार्थ्यांना वाचवलं पाहिजे

युक्रेन-रशिया युद्धावरही भाष्य करतानाच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना मायदेशी आणण्याचं आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला केलं. युक्रेन हा वेगळा देश आहे. सुंदर देश आहे. मी युक्रेनला दोनदा तीनदा गेलो होतो. पुणे जसं शिक्षणाचं माहेर घर आहे. तसं युक्रेन शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं म्हणून विद्यार्थी युक्रेनला शिकायला जातात. रशिया युक्रेनच्या युद्धात स्थानिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.

माझं केंद्र सरकारशी बोलणं झालं. केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जे जे करता येईल ते ते केंद्र सरकार करत आहे. पण तरीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. युक्रेनच्या सीमेच्याबाहेर येता येईल असा निर्णय घ्या, असं आपल्या दुतावासाने या विद्यार्थ्यांना सांगितलं. पण विद्यार्थ्यांशी बोलल्यावर त्यांच्या काही अडचणी समोर आल्या आहेत. पाच ते सहा तास चालावं लागेल इतक्या अंतरावर सीमा आहेत. जायला आमची तयारी आहे. पण भयंकर थंडी आहे. गोळीबार सुरू आहे. आम्ही कसं जाणार? असं विद्यार्थी म्हणत आहेत. त्यामुळे ते युक्रेनमध्ये अडकले आहेत. म्हणून या संकटात कुणी काय केलं? काय नाही याची चर्चा करण्याची वेळ नाही. या मुलांना कसं वाचवलं पाहिजे यावर लक्ष देण्याची गरज आहे, सत्ताधाऱ्यांकडून अधिक आहे. देशाची सूत्रे ज्यांच्याकडे आहेत ते गांभीर्याने भूमिका घेतील असं समजू या, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको, अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!

NCP Sharad Pawar | पंतप्रधान पुण्यात येताहेत त्यांचं स्वागत, पण ढगफुटी झाली तर आपल्यालाच बघायचं आहे; शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

Maharashtra News Live Update : संकटात कुणी काय केलं याची चर्चा नको तर अडकलेल्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न हवेत, शरद पवारांचा पंतप्रधानांना सल्ला!

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.