पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; मोशी -चांडोली टोलनाक्यावरची वसुली बंद

| Updated on: Oct 12, 2021 | 8:45 AM

Toll Plaza | 8 ऑक्टोबर 2021 रोजी मोशी-चांडोली टोलनाक्याची मुदत पूर्ण झाली आहे. हा टोलनाका बंद झाल्याने मोशी -चांडोली नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी थोडी फार कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; मोशी -चांडोली टोलनाक्यावरची वसुली बंद
टोलनाका
Follow us on

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारा नाशिक रोडवरील मोशी -चांडोली टोल नाका आयआरबी कंपनीने आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकराना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोडवरील मोशी-चांडोली टोल नाक्याचे रस्ता बांधणीचे पुर्ण पैसे वसूल झाल्याने आयआरबीने टोलनाका बंद करण्याचा निर्णय घेतला.

8 ऑक्टोबर 2021 रोजी मोशी-चांडोली टोलनाक्याची मुदत पूर्ण झाली आहे. हा टोलनाका बंद झाल्याने मोशी -चांडोली नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी थोडी फार कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर धुक्याची चादर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सध्या धुक्याची चादर अंथरलेली पाहायला मिळत आहे. गेली काही दिवस ऊन-पावसाचा खेळ अनुभवल्यानंतर प्रवाशांनी पहिल्यांदाच गारवा अनुभवला. सह्याद्रीच्या पर्वत रांगा मधील मावळ आणि त्यामधील धुकं यामुळे निसर्ग आणखी भरून गेला आहे. हे वातावरण आल्हाददायक असलं तरी धुक्यातून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

तीन वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते: गडकरी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा केली होती. देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. यापूर्वी रस्ते बांधणीचा वेग दिवसाला दोन किलोमीटर इतका होता.

भारताने यावर्षी 20 मार्चपर्यंत 1,37,625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम केले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी पाचपट जास्त पैसे खर्च केले आहेत. गेल्या सात वर्षात भारताने राष्ट्रीय महामार्गाची लांबी 50 टक्क्यांनी वाढवल्याचा दावाही गडकरी यांनी केला होता.

इतर बातम्या:

अजित पवारांना शरद पवारांनी उभे केले, उपमुख्यमंत्र्यांचा जीवनपट सांगताना मातोश्रींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

गुटखा खाऊ नका, दारूपासून दूर राहा, नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा; अजितदादांनी तळीरामांना फटकारलं

साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?