AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्राला पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवून त्यांच्या मागण्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि राजकीय नेत्यांच्या अटकेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, वांगचुक यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणही सुरू ठेवले आहे.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
Sonam WangchukImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 5:51 PM
Share

गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका, मागण्यांवर संसदेत चर्चा करा, असं आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गुरुग्रामच्या मेंदाता रुग्णालयात उपचार घेत आहेत. वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना चिठ्ठी लिहिली आहे. मुलांवर कारवाई करू नका. तुम्ही त्यांच्या मागण्यांवर चर्चा करा. जर तुम्ही हमी देत असाल तर मी उपोषणही सोडायला तयार आहे, असं वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे. वांगचुक यांच्या या चिठ्ठीवर आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संसदेत सार्थक चर्चा कराव्यात त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार करावा, असंही वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

उपोषणाचं हत्यार

पोलिसांनी वांगचुक यांचं उपोषण जबरदस्तीने मोडीत काढत त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण वांगचुक यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मात्र, आता थोडी लवचिक भूमिका घेतल्याने सरकार आता त्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दीपकेंचं आवाहन

दरम्यान, अभिजीत दीपके यांनीही वांगचुक यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं आहे. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही उपोषण सोडा. आपलं आंदोलन शांततेत सुरू राहील, असं दीपके यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जंतरमंतरवर अजूनही आंदोलक आहेत. मात्र, जंतरमंतरवरील वातावरण शांत आहे. आज आंदोलनाचा 33 वा दिवस आहे. सकाळपासूनच हजारो तरुण जंतरमंतरवर आहेत. पुन्हा एकदा दिल्लीत वातावरण पेटू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. तसेच या परिसरात पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे दुपारपासून जंतरमंतरवर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...