Video: रस्त्यावरचं गँगवार आता राजकारणातही; पुण्यातील राजकारण बदलतय, आंबेकरांच्या प्रकरणानंतर भाजपचंही प्रत्युत्तर

| Updated on: May 26, 2022 | 7:09 PM

पुणेः राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये (BJP and NCP) सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थेट हाणामारीपर्यंत (Politics clashesh) पोहचले आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात गँगवारने डोकं वर काढलं होते. एकमेकांवर तुटून पडणे, एकमेकांच्या गँगमधील लोकांवर बदला घेणे, तिच परिस्थिती सध्या […]

Video: रस्त्यावरचं गँगवार आता राजकारणातही; पुण्यातील राजकारण बदलतय, आंबेकरांच्या प्रकरणानंतर भाजपचंही प्रत्युत्तर
भाजपा प्रवक्ते विनायक आंबेकर
Image Credit source: tv9
Follow us on

पुणेः राजकारणात आता बदल्याची भावना दिसून येऊ लागली आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच परिस्थिती शहरातल्या राजकारणात पाहायला मिळते आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये (BJP and NCP) सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण थेट हाणामारीपर्यंत (Politics clashesh) पोहचले आहे. काही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यात गँगवारने डोकं वर काढलं होते. एकमेकांवर तुटून पडणे, एकमेकांच्या गँगमधील लोकांवर बदला घेणे, तिच परिस्थिती सध्या राजकारणात दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर (Vinayak Ambekar) यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

आंबेकरांना मारहाण झाली नंतर…

तर दुसरीकडे आंबेकर यांच्या मारहाणीनंतर भाजपनेही राष्ट्रवादीला प्रत्युत्तर मारहाणीनेच दिले आहे. राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांना माराहन केली होती त्या अप्पा जाधव यांना भाजप कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या कार्यलयात जाऊन मारहाण केली.

राजकारणाचे हे चित्र उदासवाणे

सधाच्या काळात बदलत्या राजकारणाचे हे चित्र उदासवाणे आहे मात्र  क्रियेला प्रतिक्रिया मिळत असल्याने एकमेकांवर हल्ला करणे, बदला घेणे हे प्रकार सध्या वाढतच आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकारण तर सध्या बदलतं आहे असंच वाटू लागले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे चित्र वाढत जात असल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत.

मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण

दरम्यान भाजपने मात्र आमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मारहाणीमागचं कारण पोलिसांनी शोधून काढावं अशी मागणी आता भाजपने केली आहे.

महापालिका निवडणुकांचे वारे

महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तशा गेल्या काही दिवसांपासून शहरात भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र हा संघर्ष माराहणीपर्यंतच थांबला तर बरं होईल अन्यथा शहरातील यापुढील चित्र भयावह असणार यात शंका नाही.