आणीबाणीला संघाचाच पाठिंबा, अमित शाह यांचं तेव्हा वय काय होतं?; संजय राऊत यांचा तुफान हल्ला
भाजपकडे काम नाही. आणीबाणीला 50 वर्ष झाली आहेत. लोक आणीबाणीला विसरले आहेत. काही लोक देशात अराजकता माजवत होते. रामलीला मैदानातून घोषणा झाली होती. सरकारच्या आदेशाचं पालन करू नका, असं आर्मीला सांगण्यात आलं होतं. पोलीस दलाला भडकावलं जात होतं. सरकारी आदेशाचं पालन करू नका म्हणून सांगितलं जात होतं. अशावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर त्यांनीही आणीबाणी लावली असती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jul 13, 2024
- 12:03 pm
दोन एकर शेती अन्… काल एका आमदाराला किती कोटी मिळाले?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय?
आशिष शेलार यांना काय पडलंय? तुमचं पाहा. आमचं आम्ही पाहू. जनतेने, महाराष्ट्राने तुम्हाला लोकसभेत धूळ चारली. कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आम्ही जिंकलो. तुम्ही हरला. कालची तिसरी जागा अनवाँटेड होती. ती गेली, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jul 13, 2024
- 11:46 am
पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा उघड, ‘त्या’ बनवेगिरीमुळे पद धोक्यात?
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्या बदलीनंतर अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या बनवाबनवीचा आणखी एक कारनामा उघड झाल्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jul 11, 2024
- 5:04 pm
Drunk And Drive : आता दारु पिऊन वाहन चालवलं तर लायसन्स रद्द होणार भावा, या शहरात लागू झाला कायदा
Driving License Canceled : राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना सातत्याने वाढत आहे. अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यामुळे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता या शहरात तळीरामांना दारु पिऊन वाहन चालविता येणार नाही.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jul 10, 2024
- 10:42 am
खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात काय बोलणं झालं?
Supriya Sule on Sunetra Pawar : बारामतीतील लढतीनंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात बातचित झाली का? या दोघींमध्ये काय बोलणं झालं? या दोघींमधल्या नात्यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jun 20, 2024
- 8:07 pm
लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार इरेला पेटले, म्हणाले, काही झालं तरी यावेळी…
देशात सरकार आले आहे, यावेळी आलेले सरकार दुसऱ्याची मदत घेऊन आले आहे. हे सरकार फार दिवस राहील असं वाटत नाही. कालच्या निवडणुकीत जी मदत केली. तिच मदत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही करा असेही आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jun 12, 2024
- 9:22 pm
पवारसाहेब आमचा आमदार बदला, त्याशिवाय…; दत्ता भरणेंच्या इंदापुरात स्थानिकांची शरद पवारांकडे मागणी
Sharad Pawar Indapur Dushakali Daura : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. सध्या ते इंदापूर तालुक्यात आहेत. यावेळी स्थानिकांनी एक वेगळीच मागणी पवारांपुढे ठेवली. त्यांनी आमदार बदलण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर...
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jun 12, 2024
- 8:32 pm
लोकसभा निवडणूक संपताच शरद पवारांचा दुष्काळी दौरा; म्हणाले, नुसती शेती एके शेती…
NCP Leader Sharad Pawar Dushkal Daura : शरद पवार सध्या बारामती आणि परिसरात दुष्काळी दौरा करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना शेती करताना कोणती काळजी घ्यावी? यावर भाष्य केलं आहे. शरद पवार पवार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...
- Reporter Yogesh Borse
- Updated on: Jun 12, 2024
- 8:32 pm
रवी भाऊ… अजितदादा महायुतीत आहेत हा तुमचा… रुपाली ठोंबरे यांची खरमरीत पोस्ट; धंगेकरांना उत्तर काय?
काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत राब राब राबवून घेतलं. त्यांना खूप पळवलं, अशी खोचक टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याला राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: May 26, 2024
- 3:40 pm
तर पब आणि बार बंद करा; देवेंद्र फडणवीस यांचे पुणे पोलिसांना आदेश
यात कोणताही दबाव नाही. मी सीपींना या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज तपासायला सांगितलं आहे. कोणी दबाव टाकत असेल तर कारवाई करायलाही सांगितलं आहे. आरोपीला पिझ्झा, बर्गर दिल्याचे जे आरोप झाले आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही पडताळणी करायला सांगितलं आहे. असं केलं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला बरखास्त करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: May 21, 2024
- 6:08 pm
शरद पवार यांनी विलिनीकरणावर भाष्य करताच पृथ्वीबाबा काय म्हणाले?; पुन्हा राजकारण तापणार?
सर्वसाधारणपणे मतांची टक्केवारी कमी होते तेव्हा वेगवेगळे विश्लेषक वेगवेगळे अंदाज काढतात. मतांची टक्केवारी कमी असते तेव्हा सत्ताधाऱ्यांविरोधात रोष असतो. जास्त असेल तर लोक समाधानी आहेत असा त्याचा अर्थ होतो, असं सामान्यपणे म्हटलं जातं. पण ते हार्ड अँड फास्ट सायन्स नाही. त्यामुळे त्यावर विशेष भाष्य करणं योग्य नाही. भाजपकडून शेवटच्या रात्री पैशाचा मारा झाला. अनेक लोकांना पकडण्यात आलं. शेवटचा प्रयत्न होता. मार्जिन वाढवण्यासाठी सुरू होतं. महाराष्ट्रात जे प्रश्न वर आले आहे. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि संविधान बचाव या मुद्दयावर निवडणुका झाल्या.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: May 8, 2024
- 1:52 pm
सुप्रिया सुळे यांच्यावर नवऱ्यावरून टीका; अजितदादा म्हणाले, सदानंद सुळे संसदेत पर्स घेऊन येतात का?
संविधान दिवस साजरा करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये करण्यात आलं. आम्ही संविधान बदलणार अशी वक्तव्य केली जात आहे. काँग्रेसने कधी संविधान दिन साजरा केला का? उलट काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं. काँग्रेसच्या काळात सतत संविधान दुरुस्ती करण्यता आली. एकूण 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. यातील 90 वेळा काँग्रेसच्या काळात घटना दुरुस्ती करण्यात आली आहे, असं सांगतानाच जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
- Reporter Yogesh Borse
- Updated on: May 5, 2024
- 6:49 pm