नगर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची बस पेटली, बसमध्ये होते ३० प्रवाशी

| Updated on: Mar 25, 2023 | 11:18 AM

गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात खासगी बसचा नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची आठवण शनिवारी पुन्हा झाली. जळगाववरुन निघालेल्या खासगी ट्रॅव्हलच्या बसने पुणे नगर महामार्गावर पेट घेतला. घटनास्थळी सुपा पोलीस ठाण्यातील कर्मचारी लागलीच दाखल झाले.

नगर-पुणे महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची बस पेटली, बसमध्ये होते ३० प्रवाशी
Follow us on

अहमदनगर : खासगी ट्रॅव्हल्सच्या बसची मोठी दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. पुणे-नगर महामार्गावर ही बस पेटली. या बसमधून तब्बल तीस प्रवाशी प्रवास करत होते. सर्वांचे नशिब चांगले म्हणून कोणाला काही झाले नाही. जळगाववरुन शुक्रवारी रात्री प्रवाशी घेऊन ही बस निघाली होती. नगर-पुणे महामार्गावर नारायणगव्हाण शिवारात या बसला शार्टसर्किटमुळे आग लागली. शनिवार पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे.

कसा झाला अपघात


याबाबत सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाववरुन लक्झरी बस (क्रमांक MH 29 AW 5455) पुण्यासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण तीस प्रवासी होते.बस चालक विलास गुलाब जुमडे यांना नारायणगाव येथे आल्यावर अचानक गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व ३० प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली.परंतु या घटनेत बस पूर्ण जळून खाक झाली होती.जळालेली बस क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

दैव बलवत्तर होते


बसमधून प्रवास करणाऱ्या ३० प्रवाशांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे कोणालाही काही झाले नाही. जळालेली बस पाहून दुर्घटना घडली असल्याचे लक्षात होते. परंतु सर्व प्रवाशी सुखरुप बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी येथील अग्निशमन दल दाखल झाले. सुपा पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी तात्काळ मदत कार्य सुरु केले.

नाशिकच्या दुर्घटनेची आठवण


नाशिकमध्ये खासगी बसचा गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात भीषण अपघात झाला होता. बसला लागलेल्या तब्बल 10 प्रवाशी जिवंत होरपळले होते. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. यवतमाळच्या पुसदहून खासही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी नाशिकजवळ या बसचा अपघात झाला. ट्रक आणि बस यांच्या धडक होऊन हा भीषण अपघात घडला. या अपघातानंतर बसमध्ये आग लागली. बघता बघता या आगीने संपूर्ण बसला कवेत घेतले. खासगी बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते. सुपाजवळ झालेल्या अपघातात त्या घटनेची आठवण अनेकांना झाली.