AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणी पुलाचं धक्कादायक वास्तव समोर, खुद्द तहसीलदारांनी सांगितलं काय घडलं?

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इ्ंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तहसीलदार विक्रम पाटील यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

इंद्रायणी पुलाचं धक्कादायक वास्तव समोर, खुद्द तहसीलदारांनी सांगितलं काय घडलं?
Indrayani River Bridge Collapase news
| Updated on: Jun 15, 2025 | 5:06 PM
Share

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इ्ंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 6 जणाचा मृत्यू झाला असून 20-25 जण वाहून गेले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत तहसीलदार विक्रम पाटील यांनी या घटनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले तहसीलदार? 

टीव्ही 9 मराठीशी बोलताना तहसीलदार विक्रम पाटील यांनी सांगितले की, ‘पोलिस प्रशासन सध्या मतदकार्यात व्यस्त आहे. तसेच NDRF टीमला बोलवण्यात आलं आहे. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका हजर आहेत. सध्या मदत कार्य सुरु आहे.’

या पर्यटनस्थळावर कोणतही नियोजन नाही त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. याबाबत बोलताना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले की, याबाबत नक्कीच चौकशी करण्यात येईल. सध्या आम्ही मदतकार्य करत आहोत.”

आमदार सुनिल शेळके काय म्हणाले?

या घटनेनंतर आमदार सुनिल शेळके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले की, “या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत. जमेल त्या पद्धतीने मदतकार्य केले जात आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका जाऊन पोहोचल्या आहेत. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.’

पूल कोसळण्यामागील कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार या भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहने घेऊन चढले होते. त्यामुळे पुलावरील वजन वाढले आणि हा पूल कोसळला. यात अनेक लोक वाहून गेले आहेत आणि 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 20-25 लोक वाहून गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच
Sanjay Dina Patil | राऊतांच्या आरोपांवर बोलताना संजय दिना पाटलांची जीभ घसरली; पत्रकारांशीच मग्रुरीची भाषा
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं....
Sanjay Dina Patil | राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटलांचा पलटवार; TRP साठी खोटं पसरवलं जातंय म्हणत दिलं सडेतोड उत्तर
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात
बीड हादरलं! CCTV फुटेजमध्ये काचेच्या बाटल्यांनी... विलास घुले प्रकरणात धक्कादायक खुलासा, आता...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी...
मोठी बातमी! बंडखोर नेत्याच्या अडचणींत वाढ; पक्षांतरानंतरच शिंदेंनी... राजकारणात मोठं घडतंय?
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...