AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Pune Express : सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, १२ किलोमीटरपर्यंत रांगा

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनधाराकांना बसला आहे. एक्स्प्रेस वे असणाऱ्या या मार्गावर तब्बल १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Mumbai-Pune Express : सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, १२ किलोमीटरपर्यंत रांगा
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2023 | 2:49 PM
Share

रणजित जाधव, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात शनिवारी चांदणी चौक पुलाचे लोकर्पण झाले. वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील चांदणी चौकाची समस्या सुटणार आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर नितीन गडकरी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत मांडत सूचनाही केल्या. नवीन प्रकल्प राबण्यावर भर दिला. त्याचवेळी पुणे, मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होत होती. सलग सुट्यामुळे बाहेर पडलेल्या पुणे आणि मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.

सुटी आली की वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी (Traffic Issue) ही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील एक गंभीर समस्या बनली आहे. गेल्या महिन्यात दरड कोसळण्याच्या घटनामुळे तीन, चार वेळा वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातामुळे वाहतूक कोंडीची समस्या या मार्गावर आहे. बोरघाटात ही समस्या नेहमी होत आहे. मागील आठवड्यात मेगा ब्लॉग घेऊन दरड कोसळणारा भागावर कामे करण्यात आली होती.

आता पुन्हा वाहतूक कोंडी

शनिवार, रविवार आणि मंगळवार, बुधवार अशा सलग सुट्टया आल्या आहेत. सोमवारची सुटी घेतल्यानंतर पाच दिवसांच्या सुट्या मिळत आहे. मंगळवारी १५ ऑगस्ट तर १६ ऑगस्ट रोजी पारशी नूतनवर्षाची सुटी आली आहे. यामुळे पुणे, मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडले. एकाच वेळी पाच सुट्या मिळाल्याने मोठ्या संख्येने गाड्या मार्गावर आल्या. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. शनिवारी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बोरघाटात तब्बल 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

महामार्गाचा विस्तार होणार

मुंबई पुणेसाठी एक्स्प्रेस-वे तयार करताना रोज ४० हजार वाहने जातील, असा अंदाज घेऊन महामार्ग तयार केला गेला. परंतु सध्या या महामार्गावरुन रोज ६० हजार वाहने जात आहे. शनिवार अन् रविवार आल्यावर ही संख्या वाढते. अगदी ८० ते ९० हजारांवर ही संख्या जाते. यामुळे एक्स्प्रेस आठ लेन होणार आहे. यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जुना मार्गवरही दोन लेन वाढवण्यात येणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.