AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपल्याला महासत्ता व्हायचं नाही, कारण….’, सरसंघचालक पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

"सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत", असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केलं.

'आपल्याला महासत्ता व्हायचं नाही, कारण....', सरसंघचालक पुण्यातील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?
मोहन भागवत
| Updated on: Dec 19, 2024 | 8:12 PM
Share

पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या सहजीवन व्याख्यानमाला कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. तसेच त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भारत विश्वगुरु व्हायला हवं, असं मत मांडलं. यावेळी त्यांनी जगातील विविध घटनांचं उदाहरण दिलं. “भारत विश्वगुरु झाला पाहिजे, असं आपल्या सगळ्यांना वाटतं. कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय. विचाराने जग पुढे जातेय. जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याच्या मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख-सुविधा वाढल्या आहेत. पण मनुष्याजवळ सुख आहे का?”, असा सवाल मोहन भागवत यांनी केला.

“सोयीसुविधा वाढली, पण शांती नाही. कोणीही गोळीबार करतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. युद्ध थांबत नाहीत. कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे. कट्टरपणा कमी होत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. जमीन प्रदूषित झालीय. पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही. येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे”, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

“जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात 4 टक्के लोक जगातील 80 टक्के संसाधन वापरतात. जगात हा नियम आहे. सगळ्यांचं चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. मानव जात एकच आहे, असं म्हणायची चाल आहे”, असंही त्यांनी म्हटलं.

‘या जगात एक राक्षशी प्रवृत्ती…’

“खायला बकरीचे मास पाहिजे, तर बकरी पाळली पाहिजे. सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं. सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे, एक बाजू उजळ आहे, मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगू द्या, तुम्हीही जगा. जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो”, असं स्पष्ट मत सरसंघचालकांनी व्यक्त केलं.

“आपल्याला महासत्ता व्हायचं नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहीत आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहीत आहे. पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय करावं? या देशाची भक्ती आम्ही का करावी? असा प्रश्न तरुणांना पडत असेल”, असं मोहन भागवत म्हणाले.

‘आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र’

“भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झालंय. इतरांच्या देवी दैवतांचे हाटाळणी करू नये. आम्ही सगळ्यांबरोबर मिळून मिसळून जगभरात राहतोय. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण असं झालं म्हणजे नेता होता येतं, असं नाही. आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झालं. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लक लाभो. पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही. आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे”, असंही मोहन भागवत यावेळी म्हणाले.

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.