70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

| Updated on: Jan 15, 2021 | 8:03 PM

शातांबाई तावरे यांनी गावच्या पुढाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी निवडणुकीचा अर्ज भरलाय.(Shantabai Taware Gram Panchayat Election)

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार
शांताबाई तावरे, साठे ग्रामपंचायत उमेदवार
Follow us on

सातारा: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची ( Gram Panchayat Eletion) रणधुमाळी सुरु आहे. 14 हजार 232 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसीलदार कार्यालय गजबजली आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साठे गावातील 70 वर्षांच्या शांताबाई तावरे या आजी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. विकासकामं न करणाऱ्या पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार त्यांनी केलाय. (Seventy years old Shantabai Taware contesting Sathe village Gram Panchayat Election)

पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

सातारा जिल्हयातल्या फलटण तालुक्यातील साठे गावच्या पुढारयांना अद्दल घडविण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचं शांताबाई तावरे यांनी सांगितले. गावातील रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं शांताबाई तावरे म्हणाल्या. सातारा जिल्हयातल्या फलटण तालुक्यातील साठे गावातून शांताबाई तावरे यांनी साठे फाटा वार्ड क्रमांक 1 मधून अर्ज भरला आहे. साठे गावाची लोकसंख्या 2 हजार असून ग्राम पंचायतीची सदस्य संख्या 9 इतकी आहे.

साठे गावचा विकास हाच निर्धार असल्याचे सांगून गावात महिलांवर होणारे अन्याय हे लवकर थांबवणार असल्याचे शांताबाई म्हणाल्या. तसेच गावच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा अभाव असून त्या सुविधा राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शांताबाई तावरे म्हणाल्या.

दारुबंदी करण्याचा मानस

शातांबाई तावरे यांनी साठे गावात दारुबंदी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. गावातील आरोग्य सुविधा, लाईट, पाणी या व्यवस्था नागरीकांना वेळेवर मिळाल्या पाहिजेत. यासाठी वयाच्या ७० व्या वर्षी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचं शांताबाई तावरे यांनी सांगितले. 70 वर्षीय शांताबाई तावरे या आजीच्या उमेदवारीची चर्चा साठे गावासह फलटण तालुक्यात चर्चा चांगलीच रंगली आहे.

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठ्या नेत्यांनी फिल्डींग लावल्याचं चित्र राज्यभरात दिसून आले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आणि अर्ज मागं घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयांमध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

नको मोबाईल, नको पेन ड्राईव्ह, कपबशीच पाहिजे!

(Seventy years old Shantabai Taware contesting Sathe village Gram Panchayat Election)