AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम; शरद पवार यांचा सकाळी सकाळीच हल्लाबोल

कोर्टाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोण चुकीचं आहे, हे दिसून आलंय. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम; शरद पवार यांचा सकाळी सकाळीच हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2022 | 10:31 AM
Share

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी सकाळीच मीडियाशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे, अशी टीका करतानाच कोर्टाने अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना जामीन दिला आहे. आता त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. पवार यांच्या या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तेचा गैरवापर होत आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत कोर्टाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकलं त्यात फारसं काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचं काम करण्यात आल्याचं स्पष्ट दिसतं, असं शरद पवार म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयांवरून सरकारचा दृष्टीकोण चुकीचं आहे, हे दिसून आलंय. त्यातून सत्ताधाऱ्यांनी काही तरी शिकलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला.

1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट सादर होणार आहे. ते महत्त्वाचं आहे. त्यातून सरकारची नीती काय? हे दिसून येईल. या महत्त्वाच्या कालावधीत देशाचा विचार करून संसदेची गरीमा लक्षात ठेवून सरकारनं पावलं टाकली पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कालच सूप वाजलं. गेल्या आठ दिवसात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसे उत्तर देत कामकाज पुढे नेले.

या अधिवेशन कालावधीत दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची चौकशीची घोषणा करण्यात आली. तसेच एकनाथ खडसे यांच्या पत्नीने केलेल्या भूखंड घोटाळ्याचीही एसआयटीकडून चौकशी करण्याचे जाहीर करण्यात आले.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?