Raigad : आम्ही संभाजीराजे छत्रपतींसोबत, पुण्यातल्या कार्यकर्त्यांची भावना; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे रवाना

| Updated on: Jun 05, 2022 | 9:53 AM

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून तर माघार घेतली आहे. मात्र स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत. याद्वारे जनतेशी संवाद साधून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहेत.

Raigad : आम्ही संभाजीराजे छत्रपतींसोबत, पुण्यातल्या कार्यकर्त्यांची भावना; शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडाकडे रवाना
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर करण्यात आलेली रोषणाई
Image Credit source: Facebook
Follow us on

पुणे : 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यातून कार्यकर्ते रायगडला (Raigad) निघाले आहेत. उद्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ हे कार्यकर्ते रवाना होत आहेत. संभाजीराजे छत्रपती जी कोणती भूमिका घेतील ती आमची भूमिका असेल, संभाजीराजेंवर (Sambhajiraje Chhatrapati) अन्याय झाला आहे. त्यांना खासदारकी मिळायला हवी, आम्ही संभाजीराजेंसोबत आहोत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी (Rajya Sabha) अपक्ष उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. नंतर शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही निर्माण झाली होती. मात्र पक्षप्रवेशाची अट घातल्याने अखेर तो पर्यायही बंद झाला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

रायगडावर उद्या म्हणजेच सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. याची जय्यत तयारी सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती हेदेखील याठिकाणी येणार आहेत. यासंबंधी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गडावर अन्नछत्र चालू असून, पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह , याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी समितीचे पदाधिकारी आहोरात्र झटत आहेत. येणाऱ्या शिवभक्तांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी समिती कार्यरत आहे. गडाच्या पायथ्याला वाहनतळ, मोफत शटल बससेवा, अन्नछत्र उभारण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून कार्यरत

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून तर माघार घेतली आहे. मात्र स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत राहणार आहेत. याद्वारे जनतेशी संवाद साधून त्याप्रमाणे पुढील वाटचाल करणार आहेत. नुकतेच संभाजीराजेंनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नतमस्तक होत तुमच्या नजरेतले स्वराज्य घडवायचे आहे, अशी पोस्ट केली होती. तर कार्यकर्त्यांशीदेखील संवाद साधला होता.