AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडिलांसोबत शेतातील कांदा घेऊन घरी चालला होता, वाटेत जे घडलं… अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये !

शेतातील कांदा काढून वडिलांसोबत ट्रॅक्टर ट्रॉलीत कांदा भरुन तरुण घराकडे चालला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वाटेतच ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला आणि होत्याचं नव्हतं झालं.

वडिलांसोबत शेतातील कांदा घेऊन घरी चालला होता, वाटेत जे घडलं... अशी वेळ कुठल्याही बापावर येऊ नये !
ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने अपघातात तरुणाचा मृत्यूImage Credit source: TV9
| Updated on: Mar 31, 2023 | 11:17 AM
Share

शिरुर / सुनील थिगळे : शेतातून कांदा भरुन घरी घेऊन जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरुरमधील रांजणगाव सांडस येथे घडली. अपघातात तरुणाचे वडिल जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन हा अपघात घडला. भूषण विजय रणदिवे असे मयत 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे. याबाबत मयत तरुणाचा चुलत भाऊ आशुतोष दत्तात्रय रणदिवे याने न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे. तरुणाच्या मृत्यूमुळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाल्याने घडला अपघात

रणदिवे पिता-पुत्र आपल्या शेतातील कांद्याचे पीक काढून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन घरी येते होते. देशमुख वस्ती ते रांजणगाव सांडस न्हावरे रोडकडे येत असताना वाटेत तानाजी भंडलकर यांच्या शेताजवळ ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला. येथे रस्ता उतार असल्याने ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या उजव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरुण त्याखाली आला आणि गंभीर जखमी झाला. त्याचे वडिलही यात जखमी झाले.

गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

गंभीर जखमी तरुणाला तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपाचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूमुळे रणदिवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी न्हावरे पोलीस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. तरुणा मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.