AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Landslide | दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांचा मोठा गौप्यस्फोट, ही दुर्घटना खरंच टाळता आली असती, पण…

सर्वसामान्य नागरीक, गरीब माणसांची ही दुनिया आहे की नाही? त्यांच्या जीवाला खरंच काही महत्त्व आहे की नाही? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. इर्शारवाडीच्या गावकऱ्यांनी जे सांगितलंय ते धक्कादायक आहे. हे गाव गेल्या आठ वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करतंय.

Raigad Landslide | दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांचा मोठा गौप्यस्फोट, ही दुर्घटना खरंच टाळता आली असती, पण...
| Updated on: Jul 20, 2023 | 7:09 PM
Share

रायगड | 20 जुलै 2023 : खालापूरच्या इर्शारवाडी गावावर दरड कोसळली आणि सर्व होत्याचं नव्हतं झालं. आख्खं गाव उद्ध्वस्त झालं. दुर्घटनेत खूप कमी गावकरी बचावले आहेत. जे गावकरी बचावले आहेत त्यांचा आक्रोश हा मनाला सुन्न करणारा आहे. ही घटना कोणत्या शब्दांत सांगावी आणि कशी सांगावी? असा प्रश्न आहे. हे सगळं खूप भयानक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्यावर्षी रायगडच्या महाड येथील तळीय गावातदेखील अशी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेमुळे देखील संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तळीये, माळीण सारख्या गावांच्या जखमा कधीच भरुन निघणार नाहीत अशा आहेत. असं असताना आता यावर्षीय इर्शारवाडी गावाची दुर्घटना बघायला मिळत आहे.

विशेष म्हणजे जे गावकरी बचावले आहेत त्यांनी तर अतिशय धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन हे डोंगराळ भागात राहणारे नागरीक आणि आदिवासींसाठी कितपत संवेदनशील आहेत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण दुर्घटनेत बचावलेल्या गावकऱ्यांनी आपण 2015 मध्येच पुनर्वसनाची मागणी सरकार आणि प्रशासनाकडे केली होती, असं सांगितलं आहे. सरकार आणि प्रशासनाने त्यावेळी खरंच पुनर्वसनासाठी प्रयत्न केले असते तर आज जो हाहा:कार उडालाय त्यापासून सर्वांचे प्राण वाचू शकले असते, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवलेल्या, पण…

गावकऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी खाली अशा दुर्घटनेपासून वाचण्यासाठी झोपड्यादेखील बनवल्या होत्या, पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या झोपड्या पाडून टाकल्या, अशी माहिती या गावकऱ्यांनी दिली. तसेच आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षित ठिकाणी झोपड्या बनवल्या म्हणून धमकी देखील आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज खालापूरला जावून इर्शारवाडी गावाला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच त्यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी नाना पटोले यांच्यासमोर अक्षरश: टाहो फोडला. गावकऱ्यांनी नेमकं काय घडलं? याबाबतचा सर्व घटनाक्रम सांगितला. विशेष म्हणजे संबंधित घटना घडू शकते याची जाणीव गावकऱ्यांना होती. त्यामुळे गावकऱ्यांनी 2015 मध्येच पुनर्वसनाची मागणी केली होती, अशी माहिती त्यांनी नाना पटोले यांना दिली.

गावकरी नेमकं काय म्हणाले?

“आम्ही पुनर्वसनाची मागणी केली होती. आम्ही 2015 मध्ये पुनर्वसनाची मागणी केली होती. गेल्यावर्षी देखील आम्ही खाली झोपड्या बांधल्या होत्या. पण त्या झोपड्या फॉरेस्टवाल्यांनी तोडून टाकल्या”, असं गावकऱ्यांनी नाना पटोले यांना सांगितलं.

“आम्हाला धमक्या यायला लागल्या. तुम्ही कशाला ठाकरे वरती राहा. आम्हाला थेट जातीवरुन बोलायला लागले. आदिवाशींना कोणी काय बोलला की तो गप्प राहतो. त्यामुळे आम्ही गप्प राहिलो. असं वाटतं की आदिवासी ढोर आहेत. त्यांना जंगलात ढोरासारखं जगावं, असं वाटतं लोकांना”, अशा शब्दांत नाना पटोले यांच्यासमोर गावकऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.