नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही.. राज ठाकरे ठाकरे कडाडले..
राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. जेंनझींच्या आंदोलनावर स्पष्ट बोलताना राज ठाकरे दिसले. अनेक गोरक्ष गाड्या पकडतात. मोदी परदेशात जाऊन सांगतात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत एक नंबर आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरे यांनी नुकताच भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही बोलताना राज ठाकरे दिसले. नीट पेपरफुटीच्या आंदोलनावरील त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी म्हटले की, मोदी म्हणतात मुलं चुकीच्या रस्त्यावर भरकटले आहेत. मी ओशोचं वाक्य वाचलं होतं. कौन कहता है इस देश युवक गलत रास्ते पर भटक गया है. रास्ता बनाने वालो नेही गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावर नाही. त्यांच्या आशा आकांक्षा मारल्या जात आहेत. मोदी म्हणाले, ज्यांनी ट्रोल केलं, त्यांना माफ करतो. आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची कोण माफी मागणार. हे समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी तरुण तरुणींचं म्हणणं ऐकलं पाहिजे. विद्यार्थी हवालदिल होतो तो देवाकडे जातो. मला नोकरी लागू दे. काम मिळू दे. पैसे मिळू दे. त्याची स्वप्न असतात.
पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, मोदींनी तेव्हा पूजा केली. सर्व बाजूला होते. मोदींनी बोलायला नको. चोरीबद्दल. अयोध्येतून एक खासदार निवडून आला नाही म्हणून संबंध तुटला का. आज तो हवालदिल झालेला तरुण आहे मंदिराचा रस्ता पकडतोय. त्याला धर्मांध करू नका. शिक्षणाच्या वाटेवर लावा. नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही.
नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही, असे स्पष्ट राज ठाकरे यांनी म्हटले, पुढे राज ठाकरे यांनी म्हटले की, अनेक गोरक्ष गाड्या पकडतात. मोदी परदेशात जाऊन सांगतात बीफ एक्सपोर्टमध्ये भारत एक नंबर आहे. कापल्याशिवाय होणार आहे का. त्या गोरक्षकांचं काय करायचं. आपण करतो काय. दिसली जमीन की दे अदानीला. दिसलं जंगल की दे अदानीला. आम्ही टीका करत नाहीये.
परिस्थिती समजून घेतली पाहिजे. देवळात जाऊ नतमस्तक होऊ. त्याच्या लक्षात येतं देवळातच चोऱ्या होतात. देवळात चोऱ्या? राम मंदिरात 1400 कोटी आता आकडा आलाय. 1400 कोटींची चोरी होते. यावरून सरकारवरचे त्यावर बोलत नाहीत. राम मंदिरावर मते मागताना गेला. 1400 कोटीची चोरी झाली.
