AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात जाती-जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू – श्रीमंत कोकाटेंचा आरोप

राज ठाकरे टिळक, पुरंदरे आणि रामदासांचे समर्थन करतात हा त्यांचा जातीयवाद आहे. येत्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.

महाराष्ट्रात जाती-जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू - श्रीमंत कोकाटेंचा आरोप
Shrimant Kokate and Raj ThackerayImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 2:43 PM
Share

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धारसंदर्भात केलेले दावे चुकीचे असल्याचं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे(shrimant Kokate) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.  राज ठाकरे इतिहासाची (History)मोडतोड करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचे समर्थन करत आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाची पार्श्वभूमी बाबासाहेब पुरंदरेंनी तयार केली होती. जेम्स लेन च्या पुस्तकाचं त्यांनी कौतुक केलं होतं. शिवाजी राजेंची बदनामी करणे या कटात ठाकरेंचा देखील हात असल्याचा आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे.

पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरु नये

शिवाजी महाराजांची राजमुद्रा राज ठाकरे वापरतात. राजमुद्रा वापरतात परंतु ते तसे वागत नाहीत.म्हणून त्यावर आमचा आक्षेप आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरु नये. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्यांनी बांधली असं त्यांनी औरंगाबाद मध्ये सांगितलं, ते खोटं आहे. छ्त्रपती संभाजी महाराजांची समाधी छञपती संभाजी राजेंनी बांधली. महात्मा फुले 1869 ला रायगडावर गेले. त्यांनी समाधी शोधून काढली. टिळकांनी समाधीचा एकही दगड बांधल्याची नोंद नाही. राज ठाकरे यांनी इतिहासाचा खून केलाय. लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी विवेकी भूमिका घेतली. समाधीचं बांधकाम टिळकांनी केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे तोंडावर आपटले.

द्वेष निर्माण करून दंगली घडवण्याचा उद्देश

राज ठाकरे टिळक, पुरंदरे आणि रामदासांचे समर्थन करतात हा त्यांचा जातीयवाद आहे. येत्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.

Follow Us
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....