AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया
| Updated on: Nov 08, 2022 | 8:26 PM
Share

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरण ओळखले जाते. याच कोयना धरणावर संपूर्ण महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केली जाते. मात्र धरणाचे पाणी ज्या ठिकाणावरुन वीज निर्मितीला आणले जाते त्या ठिकाणीच गळती लागल्याने खळबळ उडालीय. या गळतीतून आतापर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना नदीवर बांधण्यात आलंय. हे धरण देशातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. पण या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलंय.

कोयना धरणाच्या कॅनलमधून गळती होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. कोयना धरणातील गळतीमुळे कोकणातील तिवरे धरणफुटीची जशी घटना घडली होती, अगदी तशीच घटना घडणार नाही ना? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

“तडे गेले तरी धरणाला धोका नाही”, असं जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना धरण आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण धरण परिसरात आहे. हे धरण महाबळेश्वर येथे आहे. त्यामुळे लाखो पर्यंटक या परिसरात येत असतात. पण या पर्यटनस्थळी काही अनपेक्षित घटना घडू नये, असं प्रत्येक नागरिकाचं मत आहे.

सह्याद्रीच्या अवाढव्य डोंगरांकडे पाहिल्यानंतर आपल्या स्फुर्ती मिळते. पण त्या डोंगररांगामध्ये कोणत्याही संकटाचा जन्म होऊ नये, अशी आशा आहे. अर्थात हे सर्व आपल्या हातात नाही. पण संकट असेल तर ते दूर सारण्याची जबाबदारी प्रशासनावर नक्कीच आहे. प्रशासन आता कोयना धरणाच्या कॅनलला लागलेल्या गळतीवर नेमकं काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पाहा गळती कशी झालीय त्याचा व्हिडीओ :

जलसंपदा विभागाची नेमकी भूमिका काय?

गळतीमुळे धरणाला, वीजगृहाला किंवा डोंगराला धोका नाही. गळती थांबवण्यासाठी उपययोजना प्रस्तावीत आहे. कोयना अवजल टप्पा 1 आणि 2 च्या आपातकालीन झडप भुयार येथील भिंतीतून गळती होत असल्याचा खुलासा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दिपक मोडक यांच्याकडून देखील धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.