सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये संकट घोंघावतंय? कोयना धरणाच्या कॅनलमधून पाण्याची गळती, लाखो लीटर पाणी वाया
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 8:26 PM

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरण ओळखले जाते. याच कोयना धरणावर संपूर्ण महाराष्ट्रातील वीजनिर्मिती केली जाते. मात्र धरणाचे पाणी ज्या ठिकाणावरुन वीज निर्मितीला आणले जाते त्या ठिकाणीच गळती लागल्याने खळबळ उडालीय. या गळतीतून आतापर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. ते सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना नदीवर बांधण्यात आलंय. हे धरण देशातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. पण या धरणाच्या कॅनलला गळती लागल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. या धरणातून वीज निर्मितीसाठी घेऊन जाणाऱ्या कॅनलला गळती लागल्याची बातमी समोर आलीय. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलंय.

कोयना धरणाच्या कॅनलमधून गळती होत असल्याची बातमी समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. कोयना धरणातील गळतीमुळे कोकणातील तिवरे धरणफुटीची जशी घटना घडली होती, अगदी तशीच घटना घडणार नाही ना? अशा उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. या चर्चांवर जलसंपदा विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

“तडे गेले तरी धरणाला धोका नाही”, असं जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय.

सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये कोयना धरण आहे. अतिशय निसर्गरम्य असं वातावरण धरण परिसरात आहे. हे धरण महाबळेश्वर येथे आहे. त्यामुळे लाखो पर्यंटक या परिसरात येत असतात. पण या पर्यटनस्थळी काही अनपेक्षित घटना घडू नये, असं प्रत्येक नागरिकाचं मत आहे.

सह्याद्रीच्या अवाढव्य डोंगरांकडे पाहिल्यानंतर आपल्या स्फुर्ती मिळते. पण त्या डोंगररांगामध्ये कोणत्याही संकटाचा जन्म होऊ नये, अशी आशा आहे. अर्थात हे सर्व आपल्या हातात नाही. पण संकट असेल तर ते दूर सारण्याची जबाबदारी प्रशासनावर नक्कीच आहे. प्रशासन आता कोयना धरणाच्या कॅनलला लागलेल्या गळतीवर नेमकं काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

पाहा गळती कशी झालीय त्याचा व्हिडीओ :

जलसंपदा विभागाची नेमकी भूमिका काय?

गळतीमुळे धरणाला, वीजगृहाला किंवा डोंगराला धोका नाही. गळती थांबवण्यासाठी उपययोजना प्रस्तावीत आहे. कोयना अवजल टप्पा 1 आणि 2 च्या आपातकालीन झडप भुयार येथील भिंतीतून गळती होत असल्याचा खुलासा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दिपक मोडक यांच्याकडून देखील धोका नसल्याची माहिती मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.