“देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले”; ठाकरे गटाने शिंदे गटाची कुंडली बाहेर काढली

पाटणमध्ये आज पत्रकारांबरोबर बोलताना भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर राजकारण कसे केले.

देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले; ठाकरे गटाने शिंदे गटाची कुंडली बाहेर काढली
महादेव कांबळे | Updated on: Jan 04, 2023 | 7:32 PM

पाटणः गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने विकास कामांना गती दिल्या असल्याचे बातम्या येत आहेत. आता जी विकास कामं केली जात आहेत, ती विकासकामं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजून झालेली होती अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी दिली. शिंदे गटाबरोबर युती झाली असली तरी शिंदे गटाचा स्वाभिमान होता. मात्र शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मात्र शिंदे गटातील मंत्री आणि नेत्यांनी स्वाभिमान दाखवण्याचा काम केले नसल्याचे दिसून आले.

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोले आणि शिंदे गट हाले अशीच अवस्था आता झाली असल्याची टीका ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने ही सगळी कामं थांबवली. त्यामुळे विकासाची कामं ही उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकार्यकाळात मंजूर झालेली आहेत.

त्यामुळे शिंदे गट आज जरी ही आम्ही मंजूर केलेली कामं आहेत असं सांगत असली तरी ती विकासकामं ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली होती असंही भास्करराव जाधव यांनी सांगितले.

पाटणमध्ये आज पत्रकारांबरोबर बोलताना भास्करराव जाधव यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांच्यावर टीका करताना त्यांनी शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावर राजकारण कसे केले.

आपण निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षाचे चिन्हच त्यांनी संपवण्याचा डाव कसा केला हेही त्यांना यावेळी सांगितले. शंभूराज देसाई यांच्यामध्ये जर हिम्मत असेल तर त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता राजकारण करून दाखवावं असा टोलाही त्यांना त्यांना लगावला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us