AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज तोडणी मोहिमेचा फटका बसला चक्क महाविकास आघाडीतील मंत्र्यालाच; अंधारात करावे लागले भूमिपूजन

पुणे-सोलापूर महामार्गानाजिक "शहा पाटी" येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांना चक्क अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम करावा लागला.

वीज तोडणी मोहिमेचा फटका बसला चक्क महाविकास आघाडीतील मंत्र्यालाच; अंधारात करावे लागले भूमिपूजन
Datta Bharane electricsity.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 12:04 AM
Share

सोलापूर: महावितरणने राज्यातील शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलांची वसूली मोहीम जोरदार सुरू केली आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत (Electricity) पुरवठा तोडण्यात येत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांसह अनेक नागरिकांना बसत आहे. वीज तोडल्यामुळे अनेक गावात वीजपुरवठा खंडित (Power outage) झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या या मोहिमे विरोधात अनेक संघटना,भाजप नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. एकीकडे परिस्थिती सुरु असतानाच दुसरीकडे मात्र सत्तेतील एका मंत्र्याला (Minister) रात्रीच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम पार पाडावा लागला. त्यामुळे या विषयाची जोरदार चर्चा सुरु होती.

सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीच्या सूरज जाधवला शेतीत सातत्याने अपयश येऊ लागल्याने निराश होत त्याने आपल्या शेतात एक व्हिडिओ शूट करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी हलविण्यात आले मात्र उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती, त्यामुळे चुकीच्या शेतकरी धोरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हाच धागा पकडत आज सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी घरासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

सक्तीच्या वसुलीतून मुक्तता करा

याबरोबरच आजच संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा पुणे-सोलापूर मार्गावरील टेंभुर्णी येथे अडविला होता. शिवाय सक्तीच्या वसुलीतून शेतकऱ्यांची मुक्तता करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम

त्यांनतर आज संध्याकाळी भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील शहा गावात 12 कोटी 15 लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे-सोलापूर महामार्गानाजिक “शहा पाटी” येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे राज्यमंत्री भरणे यांना चक्क अंधारातच भूमिपूजनचा कार्यक्रम करावा लागला.

मोबाईलचे लाईट लावण्याच्या सूचना

यावेळी स्वतः मंत्रीमहोदय यांना कार्यकर्त्यांना मोबाईलचे लाईट लावण्याच्या सूचना कराव्या लागल्या. त्यामुळे वीजतोडणी मोहिमेच्या प्रश्न राज्यात पेटलेला असताना सत्तेतील मंत्र्यानांच या वीज तोडणी मोहिमेचा फटका बसल्याचे यावेळी दिसून आले.

अंधारात भूमिपूजन कार्यक्रम

हा अंधारातील भूमिपूजन कार्यक्रम झाल्या नंतर पुन्हा पुढे अनेक ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन होते, यावेळी काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत असल्याने त्याठिकाणी कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

संबंधित बातम्या

बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी कुणाला द्यायची तर देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी: नितेश राणे

Dattatraya Bharne| राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थाना समोर सोलापूरच्या भाजप नेत्यांचे आंदोलन…

नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.