AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News : “शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, अधिक बोललो तर…”

Raju Shetti on CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर 'या' नेत्याने थेट निशाणा साधला आहे. या तिघांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, असं या नेत्याने म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra News : शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय, अधिक बोललो तर...
Image Credit source: Ajit Pawar FB
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 04, 2023 | 10:04 AM
Share

सोलापूर | 04 ऑक्टोबर 2023, संदीप शिंदे : स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केली आहे. या गटार गंगेविषयी मी अधिक बोललो तर माझी जीभ विठळेल, असं राजू शेट्टी म्हणालेत. सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी मेळावा काल संध्याकाळी पार पडला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी सध्याच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. शिंदे सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरु आहे. याबाबत तुमचं मत काय असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सत्ताधारी गटातील एकही आमदार दारात उभा करण्याच्या लायकीचा नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही कुणाच्या ही भानगडीत न पडत नाही. शेतकऱ्यांसाठी काम करतो. येत्या काळातही शेतकऱ्यांची बाजू मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करण्याचा आमचा मानस आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुकीत बदल घडवेल. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे लोकप्रतिनिधी तयार करेन, असंही त्यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन वेळा भेटलो. पण काहीही उपयोग झाला नाही. कारखान्याच्या गोदामातील साखरदेखील बाहेर येऊन देणार नाही.कोल्हापुरात साखर अडवली जाऊ लागली आहे. आता आम्ही रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार आहोत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत वापरु देणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.

ऊसाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजू शेट्टी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.  ऊसाची रिकव्हरी तपासणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटमध्ये पवार लॉबी पाहायला मिळतेय. साखर कारखानदारच विश्वस्त आहेत. मग कसा कारभार होईल? सगळे साखर कारखानदार दरोडेखोरच आहेत. शेतकऱ्यांचा घामाचा पैसे खाऊन कारखानदारांकडे एवढा पैसा आला कुठून? मागचा हिशोब साखर कारखान्यांनी पूर्ण केल्याशिवाय ऊसाचं एक टिपरु देखील तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

Follow Us
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
तुकाराम मुंडेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; 5 लाखांचा दंड
‘एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते’; हुसेन दलवाईंचा मोठा दावा
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते, हुसेन दलवाईंचा दावा
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर