
मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.
साधारणपणे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराज यांनी एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हे विशाखापट्टणमला आहेत, ते आता पुण्याकडे निघाले आहेत. तानाजी सावंत हे स्वत: पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले असून, ते सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.
तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया
दरम्यान या सर्व प्रकरणावर तानाजी सावंत यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. तो अचानक एअरपोर्टला गेला, यामुळे मी कॅाशियस झालो. तो बाहेर जाताना नेहमी सांगुन जातो. पहील्यांदाच असे झाले त्यानं काहीच सांगितले नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज हे अचानक एअरपोर्टला गेले. ते घरातून कुठेही बाहेर जाताना घरी सांगून जातात. मात्र त्यांनी यावेळी घरी काहीच सांगितले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ते बेपत्ता असल्याची बातमी समोर आली, पोलिसांनी शोधही सुरू केला. मात्र आता ऋषीराज हे बेपत्ता नसून ते विशाखापट्टणमला होते, ते आता पुण्याकडे निघाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काही वेळ या बातमीनं चांगलाच गोंधळ उडाला.