AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनपाचे पाणी चोरून उभारला मिनरल वॉटरचा कारखाना; मंत्र्यांनी धाड मारून केली ही कारवाई

कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करून हे टँकर माफिया पाणी विकत असल्याचे समोर आली आहे. डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण देखील हे टँकर माफिया असल्याचे समोर आले आहे.

मनपाचे पाणी चोरून उभारला मिनरल वॉटरचा कारखाना; मंत्र्यांनी धाड मारून केली ही कारवाई
| Edited By: | Updated on: Mar 14, 2023 | 11:40 AM
Share

ठाणे : डोंबिवलीमध्ये मध्यरात्री टँकर माफियांवर उदय सामंत यांनी धाड मारली. कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करुन विकणाऱ्या कारखान्याला सिल करत टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले. डोंबिवली पाणी समस्यांचे कारण टँकर माफिया पालिकेचे पाणी चोरून दुप्पट तिप्पट किमतीने नागरिकांना विक्री करायचे. हा गोरखधंदा आता बंद होणार आहे. डोंबिवली शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण भाग टँकरवर अवलंबून आहे. यामुळे या परिसरात टँकर माफिया वाढले. दुप्पट किमतीने येथील नागरिकांना टँकरच्या मार्फत पाणीपुरवठा केला जात होता.

samant 1 n

बेकायदेशीर टँकर कंपनीला ठोकले सील

या टँकर माफियांचा पर्दाफाश शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. मध्यरात्री डोंबिवलीमध्ये धाड टाकून बेकायदेशीर टँकर कंपनीला सील ठोकलं आहे. या धाडीत कल्याण डोंबिवली पालिकेचे पाणी चोरी करून हे टँकर माफिया पाणी विकत असल्याचे समोर आली आहे. डोंबिवलीत पाणी समस्यांचे कारण देखील हे टँकर माफिया असल्याचे समोर आले आहे.

परवाने जागच्या जागी रद्द

रात्री एकूण चार ठिकाणी ही धाड टाकण्यात आली आहे. पालिकेचे पाणी चोरून अवैध मिनरल वॅाटरचा कारखाना उभारलेला आहे. या कंपनीत हजारो लिटरच्या अवैध टाक्या बांधण्यात आल्या होत्या. हे सर्व कारखाने सिल करुन टँकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी टँकर चालकांचे परवाने जागच्या जागी रद्द केले. त्याच बरोबर टँकर लॅाबीचे ऑडिट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मंत्री उदय सामंत म्हणाले, गेल्या १५-२० दिवसांत पाणी कमी झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. त्यामुळे रात्री साडेबारा वाजता वस्तुस्थिती बघीतली. महापालिका आणि एमआयडीसी येथील मुख्य लाईनवरून काही टँकर माफियांनी कनेक्शन घेतले आहेत. पोलिसांना सूचना दिल्या की त्यांच्यावर उद्या पोलीस केस दाखल झाल्या पाहिजे.

खरच पाणीचोरी होते की नाही, हे पाहण्यासाठी स्वतः उदय सामंत रात्री गेले होते. त्यांच्यासोबत पोलीस ताफाही होता. पाण्याची चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे टँकर माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Follow Us
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....