AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्य म्हणजे,…;” शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सुनावले

आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी विधान करतात. विरोधक वृत्तींशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, अर्जून यांच्या शौर्याची तुलना ते विरोधकांशी करतात.

जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्य म्हणजे,...; शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सुनावले
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9 marathi
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Feb 06, 2023 | 10:03 PM
Share

ठाणे : औरंगजेब आणि मुघल शासक होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटही केलं. त्या ट्वीटला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्वीटनं उत्तर दिलंय. भाजपनं आंदोलन केलं. या आंदोलनाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. तेव्हा भाजपचे नेते मूग गिळून गप्प का होते, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला.

एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणी शिवाजी म्हटलं तरी यांना पोटशूळ उठतो. त्यावरून रणकंदन माजवतात. हे आणि स्वतः काय म्हणतायत…शिव?? आजोबा आहेत का हे महाराजांचे. असे बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला.

ही वेडेपणाची लक्षणं

तसेच जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास आहेत. ही वेडेपणाची लक्षण असल्याची टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलीय. वाईट वृत्तीचे भलामण करणारी त्यांचा उदोउदो करणारी ही वक्तव्ये आहेत.

याचं वाईट वाटतं

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते असोत की स्वतः उद्धव ठाकरे असोत. कोणीही याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. अजित पवार यांनीही पक्षाचा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे गटाने याबद्दल काही न बोलणे याच वाईट वाटत असल्याचा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी विधान करतात. विरोधक वृत्तींशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, अर्जून यांच्या शौर्याची तुलना ते विरोधकांशी करतात. ते असते तर त्यांचा इतिहास काय, अशा पद्धतीची वक्तव्य करतात, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारसणीचा पक्ष बनविला. तळागळापर्यंत हिंदुत्वाची भूमिका पोहचविली. ठाकरे गटातील प्रमुख नेते पक्षप्रमुख असतील त्यांचा या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला पाठिंबा आहे का, असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....