AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्य म्हणजे,…;” शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सुनावले

आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी विधान करतात. विरोधक वृत्तींशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, अर्जून यांच्या शौर्याची तुलना ते विरोधकांशी करतात.

जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्य म्हणजे,...; शिंदे गटाच्या प्रवक्त्याने सुनावले
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 06, 2023 | 10:03 PM
Share

ठाणे : औरंगजेब आणि मुघल शासक होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) होते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली. आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटही केलं. त्या ट्वीटला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्वीटनं उत्तर दिलंय. भाजपनं आंदोलन केलं. या आंदोलनाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. तेव्हा भाजपचे नेते मूग गिळून गप्प का होते, असा सवालही राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला.

एरव्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना कोणी शिवाजी म्हटलं तरी यांना पोटशूळ उठतो. त्यावरून रणकंदन माजवतात. हे आणि स्वतः काय म्हणतायत…शिव?? आजोबा आहेत का हे महाराजांचे. असे बाळासाहेबांची शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला.

ही वेडेपणाची लक्षणं

तसेच जितेंद्र आव्हाड यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीचा हव्यास आहेत. ही वेडेपणाची लक्षण असल्याची टीका बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलीय. वाईट वृत्तीचे भलामण करणारी त्यांचा उदोउदो करणारी ही वक्तव्ये आहेत.

याचं वाईट वाटतं

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते असोत की स्वतः उद्धव ठाकरे असोत. कोणीही याबद्दल चकार शब्द काढलेला नाही. अजित पवार यांनीही पक्षाचा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे गटाने याबद्दल काही न बोलणे याच वाईट वाटत असल्याचा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.

आपल्याला प्रसिद्धी मिळावी, यासाठी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी विधान करतात. विरोधक वृत्तींशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण, अर्जून यांच्या शौर्याची तुलना ते विरोधकांशी करतात. ते असते तर त्यांचा इतिहास काय, अशा पद्धतीची वक्तव्य करतात, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादी विचारसणीचा पक्ष बनविला. तळागळापर्यंत हिंदुत्वाची भूमिका पोहचविली. ठाकरे गटातील प्रमुख नेते पक्षप्रमुख असतील त्यांचा या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याला पाठिंबा आहे का, असा सवालही नरेश म्हस्के यांनी विचारला.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.