सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कल्याण | 28 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये बोलताना मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचे नेते, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. फक्त हेमंत गोडसेच नाही तर खूप लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बऱ्याच लोकांना मंत्रिपद देतो, म्हणून त्यांच्याकडे नेलं. पण त्यांना अद्याप मंत्रिपद दिलेलं नाही, त्यामुळे अनेकजण पर येण्याच्या तयारीत आहेत.
भरत दादांनीही कोट शिवून ठेवलेला तो आता ॲमेझॉनवरती विकणार की काय? अशी वाईट स्थिती आहे. महामंडळ आणि मंत्रीपद देतो, म्हणून अशी अनेक लोकांना घेऊन गेले. त्या सर्वांचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्या सर्वांना हेही माहिती आहे की आपण यांच्याबरोबर राहून पूर्ण निवडून येणार नाही. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. आमच्यासोबतच राष्ट्रवादीकडून गेलेले लोकही शरद पवार साहेबांच्या ही संपर्कात आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
निष्ठेचा प्रसाद वाटण्यावरती कुठलाच कायद्याचा काही असेल मात्र तरी निष्ठेतल्या लोकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा गैरवापर होत आहे. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं खरंतर सरकारी कामात अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यावरती अवमान आणि बोलणे हा गुन्हा आहे. त्याप्रमाणे 353 हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
नितेश राणेंनी जे म्हटलं त्यावर पोलीस तत्पर असते. गृह खाते स्वतंत्रपणे काम करू शकले असते तर नितेश आल्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला असता. मात्र पोलीस यंत्रणाच्या ग्रह खात्याच्या आधी नाही. त्या ग्राहकात्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. यांना कायदा सुव्यवस्था पेक्षा निष्ठावंत यांना घाबरवणं त्यांच्या खर्चीकरण करणे यासाठी ग्रह खात्याचा वापर करावासा वाटतो, असं अंधारे म्हणाल्या.
देवेंद्र फडणीस यांना आमची नम्र विनंती आहे की, तुम्ही काही केलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यावर किती गुन्हे दाखल केले. तरी शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण घट्ट आहे की आज आम्ही सगळ्या ठामपणे त्यासोबत उभे आहोत, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.