AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी द्या नाही तर…, महिलांनी केलेली मागणी ऐकून प्रशासन हादरले

पाण्याच्या शोधात निघणाऱ्या गावातील महिला आक्रमक झाल्यात. नियमित पाणी बिल भरूनदेखील पाणी मिळत नाही. आज हंडा कळशी घेऊन गावातील मोठ्या घरासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

पाणी द्या नाही तर..., महिलांनी केलेली मागणी ऐकून प्रशासन हादरले
| Updated on: May 21, 2023 | 3:43 PM
Share

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र ग्रामपंचायत मधील अंतर्गत राजकीय वादांमुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे. गावात जलवाहिन्या टाकून त्यात पाणी नाही. त्यामुळे उन्हातान्हात पाण्याच्या शोधात निघणाऱ्या गावातील महिला आक्रमक झाल्यात. नियमित पाणी बिल भरूनदेखील पाणी मिळत नाही. आज हंडा कळशी घेऊन गावातील मोठ्या घरासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

सरपंचाकडे लेखी तक्रार

दुसरीकडे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांचे हाल पाहावत नाही. गावकऱ्यांचा होणारा संताप पाहता ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहले. पाणी देऊ शकत नाही तर विष प्राशन करण्याची परवानगी मागितली आहे.

KALYAN 2 N

पत्र सोशल मीडियावर व्हायरल

सदस्यांचे हे पत्र सदस्य सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर सध्या ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन सोमवारी काय भूमिका मांडते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

हंडा कळशीला घेऊन निषेध

गावात पाणी मिळत नसल्याने खोणीच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री महेश ठोंबरे आणि मुंकुंद ठोंबरे आक्रमक झालेत. मतदान करून मतदारांनी निवडून दिले. मात्र राजकीय वादामुळे मतदारांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी हंडा कळशी घेऊन गावात निषेध केला.

संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहले. या पत्रात त्यांनी विष प्राशन करण्याची परवानगी मागितली आहे. याविषयी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बाहेर असल्याचे कारण सांगत गावकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.