AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC : कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

या पक्ष प्रवेशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.

KDMC : कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेशImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:56 PM
Share

कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे एमआयएम पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज गुलजार मौलवी, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयएम नगरसेवक तन्झिला अयाज मौलवी, ॲड. आर. झेड. हास्मी, अर्शद शब्बीर शेख, मोहम्मद मेहबूब शेख, अकदूस सोहेल सुसे, हरमीत सिंग गुप्ता यांच्यासह 105 पदाधिकाऱ्यांनी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकरशेठ पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनिता खंडागळे, माजी नगरसेवक फैसल जलास यांनीही राष्ट्रवादी (NCP)त यावेळी जाहीर प्रवेश केला. कल्याण ग्रामीणमधील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि मनसे, युवासेना, आरपीआय, समाजवादी पार्टी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पक्षप्रवेश झाला. (MIM and BJP corporators from Kalyan-Dombivali joined NCP In the presence of Jitendra Avhad)

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार : आव्हाड

या पक्ष प्रवेशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. वाढत्या महागाईचा भार सामान्य माणसाच्या खिशावर पडतो याची जाणीव केंद्र सरकारला नाही. याउलट देशाला संविधान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न जुमानण्याची भूमिका आज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली दिसत आहे. ही भूमिका म्हणजे देशासाठी पहिली धोक्याची घंटा असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीतील आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि सुधीर वंडारशेठ पाटील शहरात पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कल्याण शहराध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (MIM and BJP corporators from Kalyan-Dombivali joined NCP In the presence of Jitendra Avhad)

इतर बातम्या

Navneet Rana on Hanuman Chalisa: बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा विसर पडलाय का?; नवनीत राणा यांचा शिवसेनेला सवाल

Chandrasekhar Bavankule | अमोल मिटकरींकडून धार्मिक वातावरण बिघडविण्याचे काम, यवतमाळात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ब्राम्हण समाजाची माफी मागावी

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....