AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोपImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2022 | 4:56 PM
Share

मुंबई: भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असा आरोप करतानाच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील. आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुलं जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुगांत मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली. महागाई किती वाढलीये याबद्दल कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर 125 रुपयांवर गेलेत. त्याबद्दल कुणी बोलत नाही. 2014 रोजी पेट्रोलचा दर 71 रुपये होता. त्यावेळी 410 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर संपूर्ण देश 14 तास अंधारात जाईल

आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. हे काय दर्शविते? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही. तर हा देश कमीत कमी 14 तास अंधारात राहिल. श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ 17 टक्क्याचा फरक आहे. या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहिजे. आता हिंस्र श्वापदे जर तुमच्या अंगात येत असतील तर कुणीच काही करु शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे लोक बेफिकीरी दाखवतायत

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. हे लोक बेफिकीरी दाखवतायत, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. 2014 रोजी 71 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार?, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde on Mitkari : अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वर भरभरुन दाद देणारे धनंजय मुंडे आता म्हणतात, तर ते खेदजनक !

CM Uddhav Thackeray on Corona: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

Amol Mitkari : मम भार्या समर्पयामि, अमोल मिटकरींचा हाच तो व्हिडीओ ज्यावर ब्राह्मण महासंघ लालेलाल, बघा पाटील, मुंडे हसून हसून लोटपोट

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.